शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

By admin | Updated: February 20, 2017 02:25 IST

नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला.

वेदप्रकाश मिश्रा : ‘तिमिरातून उदयाकडे’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला. दुर्दम्य आशावाद, अतूट धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्तीमुळेच हे शक्य होऊ शकले. प्राणांतिक वेदनाही त्यांनी हसत हसत सहन केल्या. त्यांच्या पुढे मृत्यूही हरला. तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या या प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकातून केले, हे पुस्तक प्रत्येकाला जगण्याची उमेद देणारे ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. उदय बोधनकर यांच्या ‘तिमिरातून उदयाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहोरकर, डॉ. विकास बिसने, डॉ. अनुप मरार उपस्थित होते. त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता, एक आत्मकथन किंवा आत्मचिंतन म्हणणे योग्य ठरेल, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. सुप्रिया अय्यर म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही किंवा ती कादंबरी नाही. हे एक तीव्र संवेदनाचा लेखाजोखा आहे. या सबंध लेखन प्रवासात डॉ. बोधनकर हे जगण्यावर अन् त्यासोबतच यशस्वी होण्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून आले. मृत्यूला स्पर्श करून आल्यावरही ते तेवढ्याच ताकदीने उभे आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे. डॉ. बोधनकर म्हणाले, प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावण्याचं बळ मला देणाऱ्या अनेक आप्तेष्टांचे, मित्रांचे व अनेक डॉक्टर मित्रांचे हे पुस्तक आहे. एका साध्या चुकीतून जीवनाची बिघडलेली लय, या चुकीचे दशावतार दाखविताना नियतीने कुठलीच न सोडलेली कसर, मित्रांचे व आप्तांचे प्रयत्न, याचा हा लेखाजोखा आहे. मृत्यूचे दार अनेकदा ठोठावूनही माझा जणू पुनर्जन्म झाल्याचा हा प्रवास आहे. यावेळी डॉ. माहोरकर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बोधनकर यांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रवास उलगडला. डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णालयातील त्या तीन महिन्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांचे प्रसंग उभे केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. संजय जयस्वाल, डॉ. एस. डब्ल्यू चोरघडे, डॉ. आर. के. खेमका, डॉ. मदन वराडे, डॉ. सी. एम. बोकडेआदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)