शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

By admin | Updated: February 20, 2017 02:25 IST

नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला.

वेदप्रकाश मिश्रा : ‘तिमिरातून उदयाकडे’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला. दुर्दम्य आशावाद, अतूट धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्तीमुळेच हे शक्य होऊ शकले. प्राणांतिक वेदनाही त्यांनी हसत हसत सहन केल्या. त्यांच्या पुढे मृत्यूही हरला. तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या या प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकातून केले, हे पुस्तक प्रत्येकाला जगण्याची उमेद देणारे ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. उदय बोधनकर यांच्या ‘तिमिरातून उदयाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहोरकर, डॉ. विकास बिसने, डॉ. अनुप मरार उपस्थित होते. त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता, एक आत्मकथन किंवा आत्मचिंतन म्हणणे योग्य ठरेल, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. सुप्रिया अय्यर म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही किंवा ती कादंबरी नाही. हे एक तीव्र संवेदनाचा लेखाजोखा आहे. या सबंध लेखन प्रवासात डॉ. बोधनकर हे जगण्यावर अन् त्यासोबतच यशस्वी होण्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून आले. मृत्यूला स्पर्श करून आल्यावरही ते तेवढ्याच ताकदीने उभे आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे. डॉ. बोधनकर म्हणाले, प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावण्याचं बळ मला देणाऱ्या अनेक आप्तेष्टांचे, मित्रांचे व अनेक डॉक्टर मित्रांचे हे पुस्तक आहे. एका साध्या चुकीतून जीवनाची बिघडलेली लय, या चुकीचे दशावतार दाखविताना नियतीने कुठलीच न सोडलेली कसर, मित्रांचे व आप्तांचे प्रयत्न, याचा हा लेखाजोखा आहे. मृत्यूचे दार अनेकदा ठोठावूनही माझा जणू पुनर्जन्म झाल्याचा हा प्रवास आहे. यावेळी डॉ. माहोरकर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बोधनकर यांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रवास उलगडला. डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णालयातील त्या तीन महिन्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांचे प्रसंग उभे केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. संजय जयस्वाल, डॉ. एस. डब्ल्यू चोरघडे, डॉ. आर. के. खेमका, डॉ. मदन वराडे, डॉ. सी. एम. बोकडेआदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)