शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संघप्रणीत किसान संघाचा ‘यू टर्न’; शेतकरी आंदोलन व भारत बंदमध्ये सहभाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:49 IST

Band Nagpur News किसान संघाने शेतकरी आंदोलन व भारत बंदविरोधात भूमिका घेतली आहे. या आंदोलनात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरल्याचा आरोप करीत संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रविरोधी तत्त्व आंदोलनात शिरल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खाद्य तेलांच्या आयात शुल्कवाढीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघाने पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता किसान संघाने शेतकरी आंदोलन व भारत बंदविरोधात भूमिका घेतली आहे. या आंदोलनात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरल्याचा आरोप करीत संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

खाद्य तेलांचे आयात शुल्क वाढविण्याच्या निर्णयाचा केंद्र शासनाने पुनर्विचार करीत आयात शुल्क ५० टक्के करावे. जर असे झाले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतच किसान संघालादेखील जुळावे लागेल, अशी भूमिका किसान संघातर्फे मांडण्यात आली होती. यादरम्यान ८ डिसेंबर रोजी विविध संघटनांनी शेतकरी आंदोलनावरून भारत बंद पुकारला आहे.

आतापर्यंत शेतकरी आंदोलन शिस्तबद्धपणे चालले. परंतु आता त्यात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरले आहे. काही राजकीय पक्षांच्या मदतीने देशात अराजकता पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा त्यांचा मानस आहे. अशा आंदोलनांनी शेतकरी व जनतेचेच नुकसान होते. त्यामुळे आम्ही ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी दिली.

संशोधनासह कृषी विधेयक लागू करावे

दरम्यान, किसान संघातर्फे मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी ही किमान समर्थन मूल्याच्या वरच झाली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळतील याची गॅरंटी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी कृषी न्यायालय उभारले पाहिजे, या आमच्या मागण्या कायम असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाने कृषी विधेयक मागे न घेता त्यात शेतकरीहिताचे संशोधन करून त्याला लागू करावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद