शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

संघप्रणीत किसान संघाचा ‘यू टर्न’; शेतकरी आंदोलन व भारत बंदमध्ये सहभाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:49 IST

Band Nagpur News किसान संघाने शेतकरी आंदोलन व भारत बंदविरोधात भूमिका घेतली आहे. या आंदोलनात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरल्याचा आरोप करीत संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रविरोधी तत्त्व आंदोलनात शिरल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खाद्य तेलांच्या आयात शुल्कवाढीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघाने पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता किसान संघाने शेतकरी आंदोलन व भारत बंदविरोधात भूमिका घेतली आहे. या आंदोलनात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरल्याचा आरोप करीत संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

खाद्य तेलांचे आयात शुल्क वाढविण्याच्या निर्णयाचा केंद्र शासनाने पुनर्विचार करीत आयात शुल्क ५० टक्के करावे. जर असे झाले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतच किसान संघालादेखील जुळावे लागेल, अशी भूमिका किसान संघातर्फे मांडण्यात आली होती. यादरम्यान ८ डिसेंबर रोजी विविध संघटनांनी शेतकरी आंदोलनावरून भारत बंद पुकारला आहे.

आतापर्यंत शेतकरी आंदोलन शिस्तबद्धपणे चालले. परंतु आता त्यात राष्ट्रविरोधी तत्त्व शिरले आहे. काही राजकीय पक्षांच्या मदतीने देशात अराजकता पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा त्यांचा मानस आहे. अशा आंदोलनांनी शेतकरी व जनतेचेच नुकसान होते. त्यामुळे आम्ही ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी दिली.

संशोधनासह कृषी विधेयक लागू करावे

दरम्यान, किसान संघातर्फे मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी ही किमान समर्थन मूल्याच्या वरच झाली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळतील याची गॅरंटी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी कृषी न्यायालय उभारले पाहिजे, या आमच्या मागण्या कायम असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाने कृषी विधेयक मागे न घेता त्यात शेतकरीहिताचे संशोधन करून त्याला लागू करावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद