शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मेळघाटच्या दुर्गम भागात धावणार दुचाकी रुग्णवाहिका

By admin | Updated: June 28, 2017 02:49 IST

राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत.

सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत. अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत मदत देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका सेवेत आणण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. आॅगस्ट २०१७ पासून प्रायोगिक स्तरावर मेळाघाटात चार दुचाकी रुग्णवाहिकांची मदत घेतली जाणार आहे. विदर्भातील मेळघाट कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे.या दुर्गम डोंगरी भागात ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. रस्ते, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. उत्पन्नाची साधने कमी असल्याने गरिबीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सकस अन्न मिळू शकत नाही. यातूनच माता आणि बालकांचे कुपोषण होते.अस्वच्छता, अशुद्ध पाण्याची समस्या येथे कायम जाणवते. व्यसनाचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यातच दुर्गम भाग असल्याने वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध होत नाही. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्ता सोडून आत येत नाही. या पार्श्वभूमीवर मेळघाटाच्या दुर्गम भागात दुचाकी रुग्णवाहिकेची सेवा घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, याची सुरुवात मुंबईच्या झोपडपट्टीतील गल्लीबोळात सुरू करण्याचा २०१५ रोजी निर्णय घेतला होता. परंतु निधीला घेऊन अनेक अडचणी निर्माण झाल्याने ही योजना रखडत गेली. अखेर आॅगस्ट २०१७ पासून या दुचाकी रुग्णवाहिकेला मुंबईत आणि त्याच्या पाठोपाठ मेळघाटात सुरुवात होत आहे.