शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

निवडणुकीसाठीच दोन हजाराची नोट

By admin | Updated: January 19, 2017 02:44 IST

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅशलेसची सक्ती नागपूर : उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केला. काँग्रेसच्या रिझर्व्ह बँकेला घेराव आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील काळा पैसा, दशहतवाद व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला केला होता. त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण देशाचा पाठिंबा होता. परंतु यातील एकही हेतू साध्य होताना दिसत नसल्याने आता मूळ हेतू सोडून कॅशलेस व्यवहार सुरू केला आहे. कोणत्याही देशात १०० टक्के कॅशलेस व्यवहार होत नाही. आपल्या देशात या व्यवहाराची सक्ती केली जात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कमिशन मिळावे यासाठी ही सक्ती असल्याची टीका चव्हाण यांनी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पंतप्रधानांच्या दबावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेऊन बँकेची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. त्यामुळे पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच रिझर्व्ह बँकेपुढे शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.(प्रतिनिधी)