शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठीच दोन हजाराची नोट

By admin | Updated: January 19, 2017 02:44 IST

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅशलेसची सक्ती नागपूर : उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केला. काँग्रेसच्या रिझर्व्ह बँकेला घेराव आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील काळा पैसा, दशहतवाद व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला केला होता. त्यांच्या या निर्णयाला संपूर्ण देशाचा पाठिंबा होता. परंतु यातील एकही हेतू साध्य होताना दिसत नसल्याने आता मूळ हेतू सोडून कॅशलेस व्यवहार सुरू केला आहे. कोणत्याही देशात १०० टक्के कॅशलेस व्यवहार होत नाही. आपल्या देशात या व्यवहाराची सक्ती केली जात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कमिशन मिळावे यासाठी ही सक्ती असल्याची टीका चव्हाण यांनी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पंतप्रधानांच्या दबावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेऊन बँकेची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. त्यामुळे पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच रिझर्व्ह बँकेपुढे शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.(प्रतिनिधी)