शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोन नवजात तर दोन उपजत बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज

डागातील घटना : नातेवाईकांमध्ये रोषनागपूर : बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज रविवारी दोन नवजात तर दोन उपजत (गर्भातच) बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने बाळांचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत. महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून शासकीय रुग्णालयांमधून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील बालमृत्यू थांबविण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे आजच्या प्रकरणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे डागा रुग्णालयात महिन्याचा बालमृत्यूचा दर ६ ते ८ टक्के एवढा आहे. यात उपजत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती आहे. डागा रुग्णालयात सध्याच्या स्थितीत १७५ रुग्ण भरती आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लागोपाठ दोन नवजात शिशू दगावले. यातील एकाचे वजन १.६ तर दुसऱ्याचे वजन १.७ एवढे होते. शिशूचे वजन कमी असल्याने ते दगावल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ही घटना शांत होत नाही तोच दोन गर्भवती महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत बाळांच्या काही नातेवाईकांनी यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे तर काहींनी, सुरुवातीपासून याच रुग्णालयातून उपचार घेत असताना ही वेळ आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)