शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

दोन नवजात तर दोन उपजत बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज

डागातील घटना : नातेवाईकांमध्ये रोषनागपूर : बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज रविवारी दोन नवजात तर दोन उपजत (गर्भातच) बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने बाळांचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत. महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून शासकीय रुग्णालयांमधून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील बालमृत्यू थांबविण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे आजच्या प्रकरणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे डागा रुग्णालयात महिन्याचा बालमृत्यूचा दर ६ ते ८ टक्के एवढा आहे. यात उपजत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती आहे. डागा रुग्णालयात सध्याच्या स्थितीत १७५ रुग्ण भरती आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लागोपाठ दोन नवजात शिशू दगावले. यातील एकाचे वजन १.६ तर दुसऱ्याचे वजन १.७ एवढे होते. शिशूचे वजन कमी असल्याने ते दगावल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ही घटना शांत होत नाही तोच दोन गर्भवती महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत बाळांच्या काही नातेवाईकांनी यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे तर काहींनी, सुरुवातीपासून याच रुग्णालयातून उपचार घेत असताना ही वेळ आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)