शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दोन नवजात तर दोन उपजत बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज

डागातील घटना : नातेवाईकांमध्ये रोषनागपूर : बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज रविवारी दोन नवजात तर दोन उपजत (गर्भातच) बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने बाळांचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत. महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून शासकीय रुग्णालयांमधून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील बालमृत्यू थांबविण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे आजच्या प्रकरणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे डागा रुग्णालयात महिन्याचा बालमृत्यूचा दर ६ ते ८ टक्के एवढा आहे. यात उपजत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती आहे. डागा रुग्णालयात सध्याच्या स्थितीत १७५ रुग्ण भरती आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लागोपाठ दोन नवजात शिशू दगावले. यातील एकाचे वजन १.६ तर दुसऱ्याचे वजन १.७ एवढे होते. शिशूचे वजन कमी असल्याने ते दगावल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ही घटना शांत होत नाही तोच दोन गर्भवती महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत बाळांच्या काही नातेवाईकांनी यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे तर काहींनी, सुरुवातीपासून याच रुग्णालयातून उपचार घेत असताना ही वेळ आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)