शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात विजेचे दोन लाख मीटर खराब; नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 10:47 IST

लोकमतकडे असलेल्या अधिकृत रिपोर्टमध्ये मात्र विदर्भातील जवळपास दोन लाख (१ लाख ९७ हजार ७६३) विजेचे मीटर खराब असल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमहावितरण १० टक्केही बदलू शकले नाही 

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिक अनेकदा तक्रार करीत असतात की, त्यांचे विजेचे मीटर खराब आहे. त्यामुळे रिडिंग अधिक होऊन विजेचे बिल अधिक येते. वीज वितरण कंपनी महावितरण मात्र ही बाब स्पष्टपणे नाकारते. परंतु लोकमतकडे असलेल्या अधिकृत रिपोर्टमध्ये मात्र विदर्भातील जवळपास दोन लाख (१ लाख ९७ हजार ७६३) विजेचे मीटर खराब असल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कंपनी हे मीटरसुद्धा बदलू शकलेले नाही. २५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९.९९ टक्के मीटर बदलवण्यात आले आहेत. दुसरीकडे ग्राहक मात्र विजेचे योग्य बिल भरण्यापासून वंचित आहेत.विदर्भात जवळपास ५० लाख विजेचे ग्राहक आहेत. वीज मीटर फिरण्याच्या गतीचा आढावा घेण्यात आला असता त्यात १ लाख ९७ हजार ७७६३ मीटरची गती खराब असल्याचे आढळून आले. काही मीटर अधिक वेगाने चालताना आढळले तर काही अतिशय संथ गतीने फिरत होते. अनेक नागरिकांनी याची तक्रार कंपनीकडे केली आहे. परंतु २५ नोव्हेंबरपर्यंत यापैकी १ लाख ४९ हजार ४९४ मीटर अजूनही लोकांच्या घरी लागलेले नाहीत. कंपनीने मागच्या एका महिन्यात केवळ १९, ७५३ मीटर बदलवले आहेत. ही संख्या एकूण मीटरच्या केवळ ९.९ टक्के इतकी आहे. जर याच गतीने काम सुरु राहिले तर खराब मीटर बदलवण्यासाठी दहा महिने लागतील. २८,२४५ मीटर सामान्य रिडींग देत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होताना दिसत नाही. विदर्भात सर्वाधिक मीटर यवतमाळ जिल्ह्यात खराब आहेत. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मीटर तपासण्यासाठी त्यांच्याकडे मशिनरी आहे. संशय येताच मीटरची तपासणी केली जाते. कंपनीने सुद्धा आकडेवारी समोर ठेवली आहे. यात अनेक मीटर जुने आहे. अधिकाºयांचा दावा आहे की, मीटर बदलण्याची गती सामान्य आहे. परंतु कंपनी जर मीटर खराब आहे, हे मान्य करीत असेल तर याचा फटका ग्राहकांनी का सहन करावा, असा प्रश्न आहे.

रोलेक्स, फ्लॅशचे मीटर खराब निघालेमहावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सांगितले की, रोलेक्स व फ्लॅश कंपनीचे मीटर खराब निघाले. कंपनीने असे मीटर चिन्हित केले आहे, जे ३० युनिटपर्यंत रीडिंग देत आहेत. कंपनी या मीटरला बदलवीत आहे. अगोदर त्या परिसरावर लक्ष दिले जात आहे, जिथे विजेची मागणी अधिक आहे. राज्यात मीटरला सर्वाधिक गतीने केवळ नागपूर परिक्षेत्रातच (विदर्भ) बदलविले जात आहे.

नागपुरातही १२,२६१ मीटर संशयास्पदनागपूर जिल्ह्यातही खराब मीटरची समस्या आहे. जिल्ह्यातील एकूण १२,२६१ मीटर संशयास्पद आढळून आले आहेत. कंपनीला यापैकी केवळ ११.८ टक्के (९३० मीटर) बदलविण्यात यश आले आहे. एसएनडीएलकडून मिळालेल्या भागातीलसुद्धा १०२२ मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. यापैकी केवळ ४३ मीटर बदलविण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण