शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विदर्भात विजेचे दोन लाख मीटर खराब; नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 10:47 IST

लोकमतकडे असलेल्या अधिकृत रिपोर्टमध्ये मात्र विदर्भातील जवळपास दोन लाख (१ लाख ९७ हजार ७६३) विजेचे मीटर खराब असल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमहावितरण १० टक्केही बदलू शकले नाही 

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिक अनेकदा तक्रार करीत असतात की, त्यांचे विजेचे मीटर खराब आहे. त्यामुळे रिडिंग अधिक होऊन विजेचे बिल अधिक येते. वीज वितरण कंपनी महावितरण मात्र ही बाब स्पष्टपणे नाकारते. परंतु लोकमतकडे असलेल्या अधिकृत रिपोर्टमध्ये मात्र विदर्भातील जवळपास दोन लाख (१ लाख ९७ हजार ७६३) विजेचे मीटर खराब असल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कंपनी हे मीटरसुद्धा बदलू शकलेले नाही. २५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९.९९ टक्के मीटर बदलवण्यात आले आहेत. दुसरीकडे ग्राहक मात्र विजेचे योग्य बिल भरण्यापासून वंचित आहेत.विदर्भात जवळपास ५० लाख विजेचे ग्राहक आहेत. वीज मीटर फिरण्याच्या गतीचा आढावा घेण्यात आला असता त्यात १ लाख ९७ हजार ७७६३ मीटरची गती खराब असल्याचे आढळून आले. काही मीटर अधिक वेगाने चालताना आढळले तर काही अतिशय संथ गतीने फिरत होते. अनेक नागरिकांनी याची तक्रार कंपनीकडे केली आहे. परंतु २५ नोव्हेंबरपर्यंत यापैकी १ लाख ४९ हजार ४९४ मीटर अजूनही लोकांच्या घरी लागलेले नाहीत. कंपनीने मागच्या एका महिन्यात केवळ १९, ७५३ मीटर बदलवले आहेत. ही संख्या एकूण मीटरच्या केवळ ९.९ टक्के इतकी आहे. जर याच गतीने काम सुरु राहिले तर खराब मीटर बदलवण्यासाठी दहा महिने लागतील. २८,२४५ मीटर सामान्य रिडींग देत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होताना दिसत नाही. विदर्भात सर्वाधिक मीटर यवतमाळ जिल्ह्यात खराब आहेत. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मीटर तपासण्यासाठी त्यांच्याकडे मशिनरी आहे. संशय येताच मीटरची तपासणी केली जाते. कंपनीने सुद्धा आकडेवारी समोर ठेवली आहे. यात अनेक मीटर जुने आहे. अधिकाºयांचा दावा आहे की, मीटर बदलण्याची गती सामान्य आहे. परंतु कंपनी जर मीटर खराब आहे, हे मान्य करीत असेल तर याचा फटका ग्राहकांनी का सहन करावा, असा प्रश्न आहे.

रोलेक्स, फ्लॅशचे मीटर खराब निघालेमहावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सांगितले की, रोलेक्स व फ्लॅश कंपनीचे मीटर खराब निघाले. कंपनीने असे मीटर चिन्हित केले आहे, जे ३० युनिटपर्यंत रीडिंग देत आहेत. कंपनी या मीटरला बदलवीत आहे. अगोदर त्या परिसरावर लक्ष दिले जात आहे, जिथे विजेची मागणी अधिक आहे. राज्यात मीटरला सर्वाधिक गतीने केवळ नागपूर परिक्षेत्रातच (विदर्भ) बदलविले जात आहे.

नागपुरातही १२,२६१ मीटर संशयास्पदनागपूर जिल्ह्यातही खराब मीटरची समस्या आहे. जिल्ह्यातील एकूण १२,२६१ मीटर संशयास्पद आढळून आले आहेत. कंपनीला यापैकी केवळ ११.८ टक्के (९३० मीटर) बदलविण्यात यश आले आहे. एसएनडीएलकडून मिळालेल्या भागातीलसुद्धा १०२२ मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. यापैकी केवळ ४३ मीटर बदलविण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण