शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2015 20:03 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रिधोरा/नरखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटना काटोल तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी ७ वाजताच्या सुमारास तर दुसरी घटना नरखेड तालुक्यातील माणिकवाडा येथे रविवारी सकाळी उघडकीस आल्या. गजानन संतोष सेलवटकर (५५, रा. रिधोरा, ता. काटोल) आणि चंपत जंगलू पांडे (६५, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. सेलवटकर यांच्याकडे सव्वादोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी इंडियन ओव्हरसिस बँक काटोल शाखेकडून ७५ हजार रुपये आणि रिधोरा येथील एका सोसायटीचे दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यातच कर्जवसुलीसाठी बँक प्रशासन तगादा लावत असल्याने ते तणावात होते.दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास रेशनचे धान्य आणण्याकरिता जातो म्हणून सायकल घेऊन घराबाहेर पडले. परंतु रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलगा दिनेशने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावालगतच्या कालव्याजवळ गजानन सेलवटकर यांनी आत्महत्या केल्याचे बातमी मिळाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्जवसुलीकरिता बँकेचा तगादा व सततची नापिकीमुळे सेलवटकर हताश झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. गजानन सेलवटकर हे गावात लोहारकाम करीत होते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीला धावूनही जात असत. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे. आत्महत्येची दुसरी घटना माणिकवाडा येथे घडली. चंपत पांडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून दोन लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. तसेच शेतीवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० हजार रुपये कर्ज थकीत असल्याने इतर बँकांकडून कर्ज मिळाले नाही. त्यातच यंदा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते सतत तणावात होते.दरम्यान, शनिवारी (दि.२६) रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपून चंपत पांडे घराबाहेर पडले. त्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. शासनाने दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(प्रतिनिधी)