शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2015 20:03 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रिधोरा/नरखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटना काटोल तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी ७ वाजताच्या सुमारास तर दुसरी घटना नरखेड तालुक्यातील माणिकवाडा येथे रविवारी सकाळी उघडकीस आल्या. गजानन संतोष सेलवटकर (५५, रा. रिधोरा, ता. काटोल) आणि चंपत जंगलू पांडे (६५, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. सेलवटकर यांच्याकडे सव्वादोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी इंडियन ओव्हरसिस बँक काटोल शाखेकडून ७५ हजार रुपये आणि रिधोरा येथील एका सोसायटीचे दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यातच कर्जवसुलीसाठी बँक प्रशासन तगादा लावत असल्याने ते तणावात होते.दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास रेशनचे धान्य आणण्याकरिता जातो म्हणून सायकल घेऊन घराबाहेर पडले. परंतु रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलगा दिनेशने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावालगतच्या कालव्याजवळ गजानन सेलवटकर यांनी आत्महत्या केल्याचे बातमी मिळाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्जवसुलीकरिता बँकेचा तगादा व सततची नापिकीमुळे सेलवटकर हताश झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. गजानन सेलवटकर हे गावात लोहारकाम करीत होते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीला धावूनही जात असत. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे. आत्महत्येची दुसरी घटना माणिकवाडा येथे घडली. चंपत पांडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून दोन लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. तसेच शेतीवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० हजार रुपये कर्ज थकीत असल्याने इतर बँकांकडून कर्ज मिळाले नाही. त्यातच यंदा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते सतत तणावात होते.दरम्यान, शनिवारी (दि.२६) रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपून चंपत पांडे घराबाहेर पडले. त्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. शासनाने दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(प्रतिनिधी)