शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2015 20:03 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रिधोरा/नरखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटना काटोल तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी ७ वाजताच्या सुमारास तर दुसरी घटना नरखेड तालुक्यातील माणिकवाडा येथे रविवारी सकाळी उघडकीस आल्या. गजानन संतोष सेलवटकर (५५, रा. रिधोरा, ता. काटोल) आणि चंपत जंगलू पांडे (६५, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. सेलवटकर यांच्याकडे सव्वादोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी इंडियन ओव्हरसिस बँक काटोल शाखेकडून ७५ हजार रुपये आणि रिधोरा येथील एका सोसायटीचे दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यातच कर्जवसुलीसाठी बँक प्रशासन तगादा लावत असल्याने ते तणावात होते.दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास रेशनचे धान्य आणण्याकरिता जातो म्हणून सायकल घेऊन घराबाहेर पडले. परंतु रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलगा दिनेशने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावालगतच्या कालव्याजवळ गजानन सेलवटकर यांनी आत्महत्या केल्याचे बातमी मिळाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्जवसुलीकरिता बँकेचा तगादा व सततची नापिकीमुळे सेलवटकर हताश झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. गजानन सेलवटकर हे गावात लोहारकाम करीत होते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीला धावूनही जात असत. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे. आत्महत्येची दुसरी घटना माणिकवाडा येथे घडली. चंपत पांडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून दोन लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. तसेच शेतीवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० हजार रुपये कर्ज थकीत असल्याने इतर बँकांकडून कर्ज मिळाले नाही. त्यातच यंदा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते सतत तणावात होते.दरम्यान, शनिवारी (दि.२६) रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपून चंपत पांडे घराबाहेर पडले. त्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. शासनाने दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(प्रतिनिधी)