शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

बारावीच्या परीक्षा ‘संभ्रमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. ...

नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. २३ एप्रिलपासून बारावीच्या परीक्षा होणार होत्या. पण कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्याने त्याही पुढे ढकलाव्या लागल्या. सद्या बारावीच्या परीक्षेवरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा होईल की नाही, यावर राज्य सरकार अथवा बोर्डाकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नाही. १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊननंतरच निर्णय स्पष्ट होऊ शकतो.

यासंदर्भात नागपूर बोर्डाच्या सचिव माधुरी सावरकर यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की परीक्षेच्या बाबतीत बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने, ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच सरकार परीक्षेबाबत घोषणा करू शकते. परंतु सद्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून कुठलेही निर्देश आलेले नाही. जानेवारी २०२१ नंतर राज्यात कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे बोर्डाने मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षा २३ एप्रिलला घेण्याचे नियोजन आखले होते. त्या अनुषंगाने बोर्डाकडून लेखी परीक्षेचे साहित्य केंद्र संचालकांपर्यंत पोहचविण्यात आले होेते. बोर्डाकडून परीक्षेचा निर्णय होईपर्यंत केंद्रामधील कपाटात सिलबंद ठेवले आहे. राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे १५ मे नंतरच परीक्षेबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

- बोर्डाचे वेट अ‍ॅण्ड वॉच

बोर्डाने परीक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता परीक्षेचे आयोजन अवघड आहे. लेखी परीक्षेशिवाय बोर्डाजवळ दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बोर्डाने सद्या वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

- विद्यार्थी व पालक चिंतेत

बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेली अनिश्चितेतमुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. परीक्षेच्या तारखा वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडाले आहे. सध्या राज्यात कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता, परिस्थिती सामान्य होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे लक्ष सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.

- बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बारावीनंतर विद्यार्थी भविष्याचा दिशा ठरवित असतो. त्यामुळे परीक्षा घ्याव्याच लागणार आहे. लेखी परीक्षेशिवाय दुसरा पर्याय बोर्डाकडे नाही आणि ते शक्यही नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा घ्याव्याच लागतील.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य