शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षा ‘संभ्रमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. ...

नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण बारावीच्या परीक्षेबाबत काहीही स्पष्ट केले नाही. २३ एप्रिलपासून बारावीच्या परीक्षा होणार होत्या. पण कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्याने त्याही पुढे ढकलाव्या लागल्या. सद्या बारावीच्या परीक्षेवरून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा होईल की नाही, यावर राज्य सरकार अथवा बोर्डाकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नाही. १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊननंतरच निर्णय स्पष्ट होऊ शकतो.

यासंदर्भात नागपूर बोर्डाच्या सचिव माधुरी सावरकर यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की परीक्षेच्या बाबतीत बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहे. राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने, ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच सरकार परीक्षेबाबत घोषणा करू शकते. परंतु सद्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून कुठलेही निर्देश आलेले नाही. जानेवारी २०२१ नंतर राज्यात कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे बोर्डाने मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षा २३ एप्रिलला घेण्याचे नियोजन आखले होते. त्या अनुषंगाने बोर्डाकडून लेखी परीक्षेचे साहित्य केंद्र संचालकांपर्यंत पोहचविण्यात आले होेते. बोर्डाकडून परीक्षेचा निर्णय होईपर्यंत केंद्रामधील कपाटात सिलबंद ठेवले आहे. राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे १५ मे नंतरच परीक्षेबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

- बोर्डाचे वेट अ‍ॅण्ड वॉच

बोर्डाने परीक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता परीक्षेचे आयोजन अवघड आहे. लेखी परीक्षेशिवाय बोर्डाजवळ दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बोर्डाने सद्या वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

- विद्यार्थी व पालक चिंतेत

बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेली अनिश्चितेतमुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. परीक्षेच्या तारखा वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडाले आहे. सध्या राज्यात कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता, परिस्थिती सामान्य होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे लक्ष सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.

- बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बारावीनंतर विद्यार्थी भविष्याचा दिशा ठरवित असतो. त्यामुळे परीक्षा घ्याव्याच लागणार आहे. लेखी परीक्षेशिवाय दुसरा पर्याय बोर्डाकडे नाही आणि ते शक्यही नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा घ्याव्याच लागतील.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य