शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तुषार कांति भट्टाचार्य अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:48 IST

नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशय : गुजरात पोलिसांची धावत्या रेल्वेत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणाºया बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. त्यांना नंतर नागपुरात आणून विमानाने अहमदाबादला नेण्यात आले.बुधवारी त्यांना सुरतच्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भट्टाचार्य यांच्या आप्तजनांनी लावला आहे. या कारवाईची आम्हाला सूचनाही देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.भट्टाचार्य यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी २०१० मध्ये नक्षली चळवळीचा प्रचार करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.परंतू, भट्टाचार्य हैदराबादमध्ये शिकत असताना १९७० मध्ये ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात भट्टाचार्य यांच्यावर २००७ मध्ये कोर्टात केस दाखल झाली.सुनावणी दरम्यान २००८ ते २०१३ पर्यंत ते आंध्रप्रदेशातील चेरलापल्ली कारागृहात बंद होते. ते कारागृहात बंदिस्त असतानाच २०१० मध्ये गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला अन् त्यांना फरारही घोषित केले. त्यामुळे खुद्द भट्टाचार्य यांनी ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नाही, कारागृहात आहो, अशी माहिती दिली होती. दरम्यान, २०१३ मध्ये सर्व प्रकरणातून मुक्तता झाल्यामुळे आंध्रप्रदेशातील कारागृहातून बाहेर आल्यानंतर भट्टाचार्य नागपुरातील निवासस्थानी राहू लागले.निर्वाहासाठी ते प्रसारमाध्यमात अधूनमधून लेख लिहीत असल्याचे कुटुंबीय सांगतात. असे असताना गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.माझ्या पतीचे अपहरणशोमा सेन यांचा आरोपमंगळवारी सकाळी ५.४५ ला झालेल्या या कारवाईची माहिती कळाल्यानंतर भट्टाचार्य यांच्या आप्तस्वकीयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या संबंधाने मंगळवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत तुषार कांति भट्टाचार्य यांची पत्नी नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख प्रा. शोमा सेन यांनी म्हटले की, २०१३ मध्ये कारागृहातून मुक्तता झालेल्या भट्टाचार्य यांना तब्बल चार वर्षांनंतर अटक करण्याची गरज गुजरात पोलिसांना का भासली. त्यांना कथित आरोपांमध्ये अटकच करायची होती, तर पोलीस त्यांच्या घरी का आले नाहीत, असा प्रश्नही सेन यांनी केला. अशा प्रकारे रेल्वेतून पोलिसांनी अपहरण करणे योग्य नाही. त्यांच्या क्रांतिकारी लिखाणामुळे घाबरून सरकारने ही डावबाजी केली आहे. बनावट प्रकरणे उघडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांच्या जमानतीचा प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला वीरा साथीदार होते. अशा प्रकारे त्रास देऊन त्यांना घाबरवले जात असल्याचे वीरा साथीदार म्हणाले. ं