शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन बंद करा!

By admin | Updated: September 5, 2014 01:08 IST

राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता

व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन : समस्या सोडविण्याची ग्वाही नागपूर : राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना दिलेल्या निवेदनात केली. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सदर निवेदन देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी कामठी येथील विविध समस्या मांडल्या. यात गणेशोत्सवादरम्यान भारनियमन पूर्णपणे बंद करण्यात यावे, कामठीतील जयस्तंभ चौक ते महात्मा गांधी चौक आणि पोलीस ठाणे ते शिवाजी चौका दरम्यानच्या दुभाजकावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, बाबू हरदास चौक ते भाजीमंडी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावरील जड वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान बंद करण्यात यावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करण्यात यावी, गणेशात्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात यावे, भाजीमंडी चौक ते महादेव घाट कन्हान नदीदरम्यान तात्पुरता वीज पुरवठा करून पथदिवे लावण्यात यावे, श्री गणेश विसर्जनादरम्यान अपघात होऊ नये यासाठी कन्हान नदीच्या घाटावर नावाडी, बोट व जीवन रक्षक पथक तैनात करण्यात यावे, उत्सवादरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा यासह एकूण २२ मागण्या त्यांनी लावून धरल्या होत्या. सदर निवेदन व मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कामठी येथे एक खिडकी योजना राबविली. शिवाय, महत्त्वाच्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे लावून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीही केली. जड वाहतुकीची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. (प्रतिनिधी)