शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:05 IST

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देअधिष्ठाता निसवाडे : मेडिकलमध्ये जागतिक क्षयरोग दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. यासाठी वेळोवेळी त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. शासकीय दृष्टिकोनातून हा आजार शासकीय रुग्णालयांपर्यंतच मर्यादित होता आता खासगी डॉक्टरांनाही यात सामावून घेतल्याने याची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.मेडिकलच्या रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. माध्यमा चहांदे, रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम व मेट्रन जोसेफ आदी उपस्थित होते.डॉ. निसवाडे म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांपासून ते यंत्रसामूग्री पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करते परंतु त्यांच्यावर उपचार वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर करतात. परिणामी, जबाबदारी निश्चित होत नाही. यात संशोधनालाही वाव राहत नाही. शासनाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.अनिल हिरेखण म्हणाले, गेल्या दक्षकापासून क्षयरोग संपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. परंतु क्षयरोगामुळे होणाऱ्या  मृत्यूंचे प्रमाण अद्यापही लक्षणीय आहे. यामुळे रोगाचा समूळ नाश करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक डॉ. सुशांत मेश्राम यांनी केले. संचालन डॉ. सायली कडमे यांनी केले तर आभार डॉ. नाजीया यांनी मानले. यावेळी पूर्णत: बरे झालेल्या क्षयरोगाच्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. राज गजभिये, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. योगेंद्र बन्सोड, डॉ. वृंदा सहस्त्रभोजने यांच्यासह परशुराम दोरवे आदी उपस्थित होते.क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यूडॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealth Tipsहेल्थ टिप्स