शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:05 IST

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देअधिष्ठाता निसवाडे : मेडिकलमध्ये जागतिक क्षयरोग दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. यासाठी वेळोवेळी त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. शासकीय दृष्टिकोनातून हा आजार शासकीय रुग्णालयांपर्यंतच मर्यादित होता आता खासगी डॉक्टरांनाही यात सामावून घेतल्याने याची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.मेडिकलच्या रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. माध्यमा चहांदे, रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम व मेट्रन जोसेफ आदी उपस्थित होते.डॉ. निसवाडे म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांपासून ते यंत्रसामूग्री पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करते परंतु त्यांच्यावर उपचार वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर करतात. परिणामी, जबाबदारी निश्चित होत नाही. यात संशोधनालाही वाव राहत नाही. शासनाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.अनिल हिरेखण म्हणाले, गेल्या दक्षकापासून क्षयरोग संपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. परंतु क्षयरोगामुळे होणाऱ्या  मृत्यूंचे प्रमाण अद्यापही लक्षणीय आहे. यामुळे रोगाचा समूळ नाश करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक डॉ. सुशांत मेश्राम यांनी केले. संचालन डॉ. सायली कडमे यांनी केले तर आभार डॉ. नाजीया यांनी मानले. यावेळी पूर्णत: बरे झालेल्या क्षयरोगाच्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. राज गजभिये, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. योगेंद्र बन्सोड, डॉ. वृंदा सहस्त्रभोजने यांच्यासह परशुराम दोरवे आदी उपस्थित होते.क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यूडॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealth Tipsहेल्थ टिप्स