शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 8, 2016 02:29 IST

महाराष्ट्रात सध्या अ‍ॅट्रॉसिटी कयद्याबाबत बरीच आरडाओरड सुरू आहे. कोपर्डीच्या नावावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रिपाइं आठवले गटाचा विरोध : थुलकर यांचा आंदोलनाचा इशारानागपूर : महाराष्ट्रात सध्या अ‍ॅट्रॉसिटी कयद्याबाबत बरीच आरडाओरड सुरू आहे. कोपर्डीच्या नावावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी येथे दिला. थुलकर म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. यातील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी इतकेच नव्हे तर या प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक करून त्याला शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे. या घटनेबाबत सध्या मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यांची या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी आणि आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. यासोबत अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो. मुळात अ‍ॅट्रॉसिटी आणि या घटनेचा कुठलाही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य केले आहे. तसे असेल तर त्यांनी कुठल्या प्रकरणात गैरवापर झाला आणि तो कुणी केला हे जाहीर करावे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अ‍ॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असून ती हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली. एकूणच हा सर्व प्रकार म्हणजे या कायद्याला कमजोर करण्याचाच प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यासंदर्भात मराठा समाजातील शिष्टमंडळंना भेटणार आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. रिपाइंचे शिष्टमंडळसुद्धा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. परंतु कुठल्याही परिस्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे तर दूरच राहिले त्या कायद्याचा कमजोर करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत राजन वाघमारे, राजू बहादुरे, आर.एस. वानखेडे, विनोद थुल, दुर्वास चौधरी, अशोक मेश्राम, सतीश तांबे, हरीश लांजेवार, मेघराज घुटके, राजेश ढेंगरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रस्तावआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्यात याव्यात, असा प्रस्ताव रिपाइं (आठवले) विदर्भ कार्यकारिणीने पारित केला असून तो राज्य कार्यकारिणीकडे पाठविला आहे. यासंदर्भात मुंबई वगळता उर्वरित जिल्हापातळीवर तेथील राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच आर.एस. वानखेडे यांची पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच पूर्व विदर्भाची आणि एकूणच सर्व जिल्ह्यांची सुद्धा नवीन कार्यकारिणी निवडली जाईल, असेही थुलकर यांनी स्पष्ट केले.