शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

दारूची वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या ...

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाला. बुटीबोरी पोलीस स्टेशनअंतर्गत वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हेमराज ऊर्फ पिंट्या देवीदास पिंपळे (२५, रा.मासळ, ता.लाखांदूर. जि. भंडारा) असे मृत चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक हेमराज हा नागपूर येथील भारतीय रोड कॅरिअर ट्रान्सपोर्टमध्ये दीड वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे औरंगाबादवरून अशोक लेल्यांड ट्रक (क्र. एमएच ४० वाय ८१२६) विदेशी दारू ओसीब्लू १८० एम एल.निपा असलेल्या ३०० पेट्या, तर बी सेवनचे ७५० एमएलच्या बॉटल असलेल्या ७०० पेट्या असा हजार पेट्या माल घेऊन नागपूरकडे निघाला. गुरुवारी मध्यरात्री जवळपास १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलानजीक ट्रक पोहोचला असता, रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने, तो चुकीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाला. त्याच वेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाखाली कोसळला. दरम्यान, पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या जिवंत तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने आग लागली.

या घटनेत हेमराजला स्वत:ला वाचविण्यास संधी मिळाली नसल्याने, त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती, आशिष मोरखडे, अनिल व्यवहारे, बाबुलाल वडमे, सतेंद्र रंगारी, नारायण भोयर, विनायक सातव, राकेश तालेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकमध्ये दारू असल्याने आगीचे रौद्र रूप होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.

चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

दारूच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यात पोलीस आणि अग्निशनम दलाला चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यात चालकांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याचे खंत ठाणेदार कोकाटे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत दारू आणि ट्रक असा एकूण ८० लाख ६७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाल्याची नोंद घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय भारती या घटनेचा तपास करीत आहेत.