शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

दोन अटींमुळे विद्यार्थी अडचणीत

By admin | Updated: April 1, 2015 02:21 IST

ही बाब लक्षात घेऊन ‘एमएसबीटीई’ने २७ मार्च रोजी परिपत्रक जारी केले.

नागपूर : ही बाब लक्षात घेऊन ‘एमएसबीटीई’ने २७ मार्च रोजी परिपत्रक जारी केले. त्यानुसार ३० व ३१ मार्च रोजी अशा विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ अर्ज साहजिकच विद्यार्थी अर्ज भरण्याच्या तयारीला लागले होते. परंतु या अर्जासोबत विद्यार्थ्यांना जे हमीपत्र भरून द्यायचे होते, त्यातील दोन अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याचे टाळले आहे. हमीपत्रातील अट क्र.३ व अट क्र.४ मधील मुद्दे हे विद्यार्थ्यांच्या मनोबलावरच परिणाम करणारे होते. विलंबाने परीक्षा अर्ज भरल्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन थिअरी परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे यातील कुठलीही एक परीक्षा देणे बंधनकारक असल्याचे विद्यार्थ्यांना मुद्दा क्र.३ नुसार लिहून द्यायचे होते. तर अट क्र.४ नुसार तर प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊनदेखील परीक्षा देता येणार नाही. यामुळे मागील परीक्षांचे विषय बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसमोर यामुळे मोठा पेच निर्माण झाला व यातूनच अनेकांनी अर्ज भरले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.विलंब शुल्कातदेखील वाढ१५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी १५०० रुपये विलंब शुल्क घेण्यात येत होते. परंतु ‘एमएसबीटीई’ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ३० व ३१ मार्च रोजी चार हजार रुपये दंडासह विद्यार्थ्यांना हे अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. ‘पॉलिटेक्निक’च्या अभ्यासक्रमांत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे केवळ परीक्षेसाठी चार हजार रुपये विलंब शुल्क भरणे अनेकांना शक्य झाले नाही. ‘एमएसबीटीई’ने विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा होता अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.विद्यार्थ्यांना शिक्षा का?महाविद्यालयांनीदेखील या अटींबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा अटींमुळे परीक्षा देण्याअगोदरच विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण निर्माण झाला आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडून जर शुल्क घेण्यात येत आहे तर त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणे ही ‘एमएसबीटीई‘ची जबाबदारी आहे. जर त्या कमी पडल्या तर विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा का असा सवाल ‘पॉलिटेक्निक’ संस्थाचालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले. यासंदर्भात ‘एमएसबीटीई’चे सचिव डॉ.विनोद मोहितकर यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. परंतु ते बैठकीत व्यस्त असल्याचे कारण देण्यात आले.