शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:51 IST

visa Nagpur News नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.

ठळक मुद्देनागपुरातच कार्यालय सुरू करण्याची मागणीज्येष्ठ नागरिकांना जास्त अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणावर विदेशात असून त्यांच्या नातेवाईकांचे तिकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र त्यांना व्हिसासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागते. कोरोनाच्या संसगार्मुळे वाहतुकीची साधनेदेखील सहजपणे उपलब्ध नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी तर बाहेरगावी प्रवास करणे धोक्याचेदेखील ठरू शकते. नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीसह विदर्भातील हजारो तरुण विदेशांमध्ये शिक्षण किंवा रोजगारानिमित्त गेलेले आहेत. काही जण तर तेथे स्थायिकदेखील झाले आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी कुटुंबातील लोकांना व्हिसा घेणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते. या प्रक्रियेत २ ते ३ दिवस जातात. अशा स्थितीत त्यांची अडचण होते. विशेषत: अनलॉकडाऊनचे टप्पे सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळण्यावरच लोकांचा भर आहे. लोक विमान, बसने प्रवास करणे टाळत आहे. खासगी वाहनाने गेले तर जाण्यासाठीच १६ ते २२ तास लागत आहे. इतका दूरचा प्रवास करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक होते.नागपूर देशाचे केंद्रस्थान आहे. येथे व्हिसा कार्यालय सुरू झाले तर मध्य भारतातील लोकांनादेखील त्याचा फायदा होईल. त्यामुळेच येथे व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात केशव कुकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रदेखील लिहिले आहे.

टॅग्स :Visaव्हिसा