शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:51 IST

visa Nagpur News नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.

ठळक मुद्देनागपुरातच कार्यालय सुरू करण्याची मागणीज्येष्ठ नागरिकांना जास्त अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणावर विदेशात असून त्यांच्या नातेवाईकांचे तिकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र त्यांना व्हिसासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागते. कोरोनाच्या संसगार्मुळे वाहतुकीची साधनेदेखील सहजपणे उपलब्ध नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी तर बाहेरगावी प्रवास करणे धोक्याचेदेखील ठरू शकते. नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीसह विदर्भातील हजारो तरुण विदेशांमध्ये शिक्षण किंवा रोजगारानिमित्त गेलेले आहेत. काही जण तर तेथे स्थायिकदेखील झाले आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी कुटुंबातील लोकांना व्हिसा घेणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते. या प्रक्रियेत २ ते ३ दिवस जातात. अशा स्थितीत त्यांची अडचण होते. विशेषत: अनलॉकडाऊनचे टप्पे सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळण्यावरच लोकांचा भर आहे. लोक विमान, बसने प्रवास करणे टाळत आहे. खासगी वाहनाने गेले तर जाण्यासाठीच १६ ते २२ तास लागत आहे. इतका दूरचा प्रवास करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक होते.नागपूर देशाचे केंद्रस्थान आहे. येथे व्हिसा कार्यालय सुरू झाले तर मध्य भारतातील लोकांनादेखील त्याचा फायदा होईल. त्यामुळेच येथे व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात केशव कुकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रदेखील लिहिले आहे.

टॅग्स :Visaव्हिसा