शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

त्रिपुराच्या विजयाचा संघाने रचला पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:28 IST

त्रिपुरा, नागालँड या राज्यांमधील निकालानंतर संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय जरी भाजपाचा असला तरी प्रत्यक्षात येथे पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते.

ठळक मुद्देईशान्येकडील राज्यात शून्याहून केली होती सुरुवात : तरुणांना जोडण्यावर दिला भर

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्रिपुरा, नागालँड या राज्यांमधील निकालानंतर संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय जरी भाजपाचा असला तरी प्रत्यक्षात येथे पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते. अगदी शून्यापासून सुरुवात करून संघ व भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश आले. या विजयानंतर संघभूमी असलेल्या नागपुरात स्वयंसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ईशान्येकडील राज्यात कार्य केलेल्या प्रचारकांशी संवाद साधून तेथील नेमके कार्य जाणून घेतले.ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघाचे कार्य वाढीस लागले असून तळागाळापर्यंत तेथील स्वयंसेवक व प्रचारक पोहोचत आहेत. खडतर परिस्थितीत संघ प्रचारकांनी दुर्गम क्षेत्रात केलेल्या कार्याची पावती भाजपाला या विजयाच्या रूपात मिळाली. या भागात वाढणारे धर्मांतरण, सीमेवरून होणारी घुसखोरी, शिक्षणाचा अभाव इत्यादी मुद्यांवर संघाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली व यासंदर्भात विविध उपक्रमदेखील राबविले. या मुद्यांवर संघ प्रचारकांनी अगदी दुर्गम भागात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. येथे शाखाविस्तारावरदेखील भर देण्यात आला होता.सुनील देवधरांचे नागपूर ‘कनेक्शन’त्रिपुरामध्ये राजकीय पटलावर भाजपाच्या विजयाचे खरे शिल्पकार मानण्यात येत असलेले सुनील देवधर यांचे नागपूरशी ऋणानुबंध जुळले आहेत. संघ प्रचारक म्हणून त्यांनी आमच्यासोबतच कार्य करण्यास सुरुवात केली. समर्पित व्यक्तिमत्त्व असलेल्या देवधर यांनी तेथील लोकांमध्ये विश्वास जागविला. नागपूरच्या मातीचे त्यांच्यावर संस्कार असून आजही ते येथील सहकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहेत.संघ म्हणताच, व्हायचे दरवाजे बंदएक काळ होता जेव्हा संघ स्वयंसेवक म्हटले की ईशान्येकडील राज्यांमध्ये नागरिक दरवाजे बंद करायचे. तेथील नक्षलवाद्यांनी अनेक संघ प्रचारकांची हत्यादेखील केली. अशा परिस्थितीतदेखील आसाममधील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर संघ प्रचारकांनी भर दिला होता. चार वर्षांअगोदर आसाममध्ये भडकलेली जातीय हिंसा असो किंवा नैसर्गिक आपत्ती, प्रत्येकवेळी संघ स्वयंसेवक स्थानिक नागरिकांसोबत उभे राहिले व मदतीचा हात दिला. सेवा भारती तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा प्रकल्पासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, अशी माहिती ईशान्येकडील राज्यांत सुमारे १० वर्षे प्रचारक राहिलेले सुनील किटकरु यांनी दिली.नागपूर,विदर्भातील अनेक प्रचारक कार्यरतत्रिपुरासह ईशान्येकडील सर्वच राज्यांमध्ये विदर्भ, नागपुरातील अनेक स्वयंसेवक व प्रचारक कार्यरत आहेत. राजेश देशकर हे दक्षिण आसाम प्रांताचे सेवाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी तर हे क्षेत्र अक्षरश: पिंजून काढले व तेथील लोकांमधीलच एक होऊन गेले आहेत.विद्यार्थी जोडले, शिक्षणावर दिला भरविद्यार्थी व तरुणांच्या समस्यांवरदेखील संघ पदाधिकारी सातत्याने काम करत होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एकल विद्यालयांचा प्रयोग राबविण्यात आला. ईशान्येकडील राज्यांमध्ये ३०० हून अधिक एकल विद्यालय चालत आहेत. याशिवाय हिंसाग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागात संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांवर देशात निरनिराळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्यावेळी संघाने त्यांना मदतीचा हात दिला होता. संघाने विद्यार्थी आणि तरुणांना जोडणे भाजपासाठी खºया अर्थाने फायद्याचे ठरले.

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय