शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाविरोधात तृणमूल परत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्य पोलिसांना मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत तैनात न करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्य पोलिसांना मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत तैनात न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, शुक्रवारी ‘तृणमूल’च्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका हे फार दूरचे वास्तव असून, ही जबाबदारी आयोग कशी पार पाडणार आहे, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

या शिष्टमंडळात सौगत्त रॉय, यशवंत सिन्हा, मो. नदिमुल हक, प्रतिमा मंडल आणि महुआ मोईत्रा हे होते. निवडणूक आयोगाची एकूण भूमिका पक्षपाती आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होणार नाही, असेच चित्र आहे. केवळ निवडणूक आयोगाच्या धोरणामुळे असे होणार असल्याचा आरोप ‘तृणमूल’तर्फे लावण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केंद्रीय व राज्य सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात यावे. ईव्हीएमसोबत १०० टक्के व्हीव्हीपॅटची चाचपणी व्हावी. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याबाबत सखोल अहवाल जारी करण्यात यावा, अशी मागणीदेखील शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.