शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निवडणूक आयोगाविरोधात तृणमूल परत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्य पोलिसांना मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत तैनात न करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्य पोलिसांना मतदान केंद्रांच्या १०० मीटर आत तैनात न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, शुक्रवारी ‘तृणमूल’च्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका हे फार दूरचे वास्तव असून, ही जबाबदारी आयोग कशी पार पाडणार आहे, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

या शिष्टमंडळात सौगत्त रॉय, यशवंत सिन्हा, मो. नदिमुल हक, प्रतिमा मंडल आणि महुआ मोईत्रा हे होते. निवडणूक आयोगाची एकूण भूमिका पक्षपाती आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होणार नाही, असेच चित्र आहे. केवळ निवडणूक आयोगाच्या धोरणामुळे असे होणार असल्याचा आरोप ‘तृणमूल’तर्फे लावण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केंद्रीय व राज्य सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात यावे. ईव्हीएमसोबत १०० टक्के व्हीव्हीपॅटची चाचपणी व्हावी. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याबाबत सखोल अहवाल जारी करण्यात यावा, अशी मागणीदेखील शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.