शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:44 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे.

ठळक मुद्दे‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे उपोषण : शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे. बळी गेलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात धरमपेठ येथील लालबहादूर चौक येथे उपोषणाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दिवसभर चाललेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाºयांनी भेट देऊन समर्थन दिले. शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी लावला. जर दिवाळीच्या अगोदर शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, कीटकनाशकांमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना सरकारकडून मदत मिळाली नाही तर दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला. खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत पवार यांनी उपोषण सोडले. अरुण वनकर, दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, अ‍ॅड.नीरज खांदेवाले, राम आकरे, विजय शिंदे इत्यादींनी यावेळी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी संघटनेतर्फे मिलिंद महादेवकर, प्रसाद इंगळे, मंगेश पात्रीकर, ऋषीकेश जाधव, अभिजीत याहूल, अविनाश शेरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.