शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

नागपुरात राहणाऱ्या आदिवासींना ‘शबरी घरकूल’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:42 IST

सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात राहणाऱ्या फक्त २७ आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

ठळक मुद्दे११ वर्षात फक्त २७ लाभार्थ्यांनाच लाभ शेकडो अर्ज अजूनही प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राहणाऱ्या आदिवासींसाठी शासनाने शबरी घरकूल योजनेची २००९ पासून अंमलबजावणी केली. पण या योजनेसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने गेल्या ११ वर्षात फक्त २७ लोकांना शबरीचा लाभ मिळाला. अजूनही शेकडोच्या संख्येने अर्ज प्रकल्प कार्यालयात पेंडिंग पडलेले असून, अनुसूचित जमातीतील अनेकांना अजूनही ‘शबरीची’ प्रतीक्षा आहे.महापालिकेतर्फे अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर शहरातील अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकूल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आदिवासी संघटनांनी शासनाकडे केली होती. २००९ पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर यांच्याकडे योजनेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. शबरी घरकूल योजनेसाठी नागपूर प्रकल्पाअंतर्गत २००९ ते २०१४-१५ या कालावधीत एकूण ३८ आदिवासी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नागपूर शहर (महानगर पालिका क्षेत्र) करिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून प्रती घरकूल २ लाख रुपये प्रमाणे २७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तेव्हा अर्ज केलेले ११ लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरही २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ४० लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. २०१८-१९ मध्ये ३०० च्या जवळपास अर्ज नव्याने दाखल झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ पासून शबरीच्या अंमलबजावणीकरिता निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल मंजुरीबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत फक्त २७ आदिवासींना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

शासनाने तत्काळ निधीला मंजुरी द्यावीगेल्या ११ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच शहरातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाचे अध्यक्ष दिनेश शेराम, उपाध्यक्ष विजय परतेकी, स्वप्निल मसराम, सुरेंद्र नेताम, अनिकेत माकोडे, विनय ऊइके, राहुल मेश्राम , राजेश ऊइके, राकेश पाल, दिवेश धुर्वे आदींनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार