शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपुरात राहणाऱ्या आदिवासींना ‘शबरी घरकूल’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:42 IST

सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात राहणाऱ्या फक्त २७ आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

ठळक मुद्दे११ वर्षात फक्त २७ लाभार्थ्यांनाच लाभ शेकडो अर्ज अजूनही प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राहणाऱ्या आदिवासींसाठी शासनाने शबरी घरकूल योजनेची २००९ पासून अंमलबजावणी केली. पण या योजनेसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने गेल्या ११ वर्षात फक्त २७ लोकांना शबरीचा लाभ मिळाला. अजूनही शेकडोच्या संख्येने अर्ज प्रकल्प कार्यालयात पेंडिंग पडलेले असून, अनुसूचित जमातीतील अनेकांना अजूनही ‘शबरीची’ प्रतीक्षा आहे.महापालिकेतर्फे अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर शहरातील अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकूल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आदिवासी संघटनांनी शासनाकडे केली होती. २००९ पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर यांच्याकडे योजनेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. शबरी घरकूल योजनेसाठी नागपूर प्रकल्पाअंतर्गत २००९ ते २०१४-१५ या कालावधीत एकूण ३८ आदिवासी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नागपूर शहर (महानगर पालिका क्षेत्र) करिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून प्रती घरकूल २ लाख रुपये प्रमाणे २७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तेव्हा अर्ज केलेले ११ लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरही २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ४० लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. २०१८-१९ मध्ये ३०० च्या जवळपास अर्ज नव्याने दाखल झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ पासून शबरीच्या अंमलबजावणीकरिता निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल मंजुरीबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत फक्त २७ आदिवासींना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

शासनाने तत्काळ निधीला मंजुरी द्यावीगेल्या ११ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच शहरातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाचे अध्यक्ष दिनेश शेराम, उपाध्यक्ष विजय परतेकी, स्वप्निल मसराम, सुरेंद्र नेताम, अनिकेत माकोडे, विनय ऊइके, राहुल मेश्राम , राजेश ऊइके, राकेश पाल, दिवेश धुर्वे आदींनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार