शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

आदिवासी हे हिंदूच

By admin | Updated: October 4, 2015 03:14 IST

वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत.

आदिवासी मंत्री विष्णू सावरा : अ. भा. वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलन नागपूर : वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत. त्यामुळे आदिवासींना हिंदूंपासून वेगळे करण्याचे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे केले. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्ता संमेलनातील एका सत्रात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल आणि आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराव व्यासपीठावर होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, आदिवासींसाठी वनवासी कल्याण आश्रमाद्वारे सुरूअसलेले काम अतिशय योग्य आहे. आदिवासींचे अधिकार हिरावून घेण्यासाठी काही लोकं स्वत:ला आदिवासी म्हणवून घेत आहेत. आदिवासींमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण शासनस्तरावर लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अ.भा. वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रकाशित वनबंधू या मासिक पत्रिकेच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाखशासनातर्फेसुद्धा आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे काम केले जात आहे. राज्य सरकार राज्यातील ग्रामपंचायतींना यंदा २५८ कोटी रुपये देणार आहे. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट १० लाख रुपये मिळतील. यासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यंदा २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकात्म दर्शन हा भारताचा आत्मा ईश्वर हा प्रत्येक सजीवात वास करतो. तो मनुष्य, पशु, पक्षी इतकेच नव्हे तर वृक्षांमध्येसुद्धा आहे, अशी आपली भारतीय विचारधारा आहेत. त्यामुळे आपण सर्व मनुष्याप्रति, पशुपक्ष्यांप्रति इतकेच नव्हे तर वृक्षांप्रति सुद्धा आदरभाव ठेवतो. हा प्रकार केवळ भारतात दिसून येतो. तो दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येत नाही. हाच एकात्म भाव आहे. तो भारताचा आत्मा आहे. रोजच्या व्यवहारात आपण तो जगतो. भारताची ही अमूल्य देण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.