शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आदिवासी हे हिंदूच

By admin | Updated: October 4, 2015 03:14 IST

वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत.

आदिवासी मंत्री विष्णू सावरा : अ. भा. वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलन नागपूर : वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत. त्यामुळे आदिवासींना हिंदूंपासून वेगळे करण्याचे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे केले. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्ता संमेलनातील एका सत्रात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल आणि आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराव व्यासपीठावर होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, आदिवासींसाठी वनवासी कल्याण आश्रमाद्वारे सुरूअसलेले काम अतिशय योग्य आहे. आदिवासींचे अधिकार हिरावून घेण्यासाठी काही लोकं स्वत:ला आदिवासी म्हणवून घेत आहेत. आदिवासींमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण शासनस्तरावर लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अ.भा. वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रकाशित वनबंधू या मासिक पत्रिकेच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाखशासनातर्फेसुद्धा आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे काम केले जात आहे. राज्य सरकार राज्यातील ग्रामपंचायतींना यंदा २५८ कोटी रुपये देणार आहे. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट १० लाख रुपये मिळतील. यासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यंदा २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकात्म दर्शन हा भारताचा आत्मा ईश्वर हा प्रत्येक सजीवात वास करतो. तो मनुष्य, पशु, पक्षी इतकेच नव्हे तर वृक्षांमध्येसुद्धा आहे, अशी आपली भारतीय विचारधारा आहेत. त्यामुळे आपण सर्व मनुष्याप्रति, पशुपक्ष्यांप्रति इतकेच नव्हे तर वृक्षांप्रति सुद्धा आदरभाव ठेवतो. हा प्रकार केवळ भारतात दिसून येतो. तो दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येत नाही. हाच एकात्म भाव आहे. तो भारताचा आत्मा आहे. रोजच्या व्यवहारात आपण तो जगतो. भारताची ही अमूल्य देण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.