शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आदिवासी हे हिंदूच

By admin | Updated: October 4, 2015 03:14 IST

वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत.

आदिवासी मंत्री विष्णू सावरा : अ. भा. वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलन नागपूर : वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत. त्यामुळे आदिवासींना हिंदूंपासून वेगळे करण्याचे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे केले. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्ता संमेलनातील एका सत्रात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल आणि आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराव व्यासपीठावर होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, आदिवासींसाठी वनवासी कल्याण आश्रमाद्वारे सुरूअसलेले काम अतिशय योग्य आहे. आदिवासींचे अधिकार हिरावून घेण्यासाठी काही लोकं स्वत:ला आदिवासी म्हणवून घेत आहेत. आदिवासींमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण शासनस्तरावर लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अ.भा. वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रकाशित वनबंधू या मासिक पत्रिकेच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाखशासनातर्फेसुद्धा आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे काम केले जात आहे. राज्य सरकार राज्यातील ग्रामपंचायतींना यंदा २५८ कोटी रुपये देणार आहे. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट १० लाख रुपये मिळतील. यासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यंदा २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकात्म दर्शन हा भारताचा आत्मा ईश्वर हा प्रत्येक सजीवात वास करतो. तो मनुष्य, पशु, पक्षी इतकेच नव्हे तर वृक्षांमध्येसुद्धा आहे, अशी आपली भारतीय विचारधारा आहेत. त्यामुळे आपण सर्व मनुष्याप्रति, पशुपक्ष्यांप्रति इतकेच नव्हे तर वृक्षांप्रति सुद्धा आदरभाव ठेवतो. हा प्रकार केवळ भारतात दिसून येतो. तो दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येत नाही. हाच एकात्म भाव आहे. तो भारताचा आत्मा आहे. रोजच्या व्यवहारात आपण तो जगतो. भारताची ही अमूल्य देण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.