शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

आदिवासी विभागानेच केला आदिवासींमध्ये भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:01 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींना अन्नधान्य वाटपाचे नियोजन जाहीर केले आहे. परंतु हे नियोजन करताना विभागाने आदिवासींमध्येच भेदभाव केला आहे. राज्यातील अशा अनेक जिल्ह्यात जिथे आदिवासींची लोकसंख्या आहे, अशाही जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे कामधंदे ठप्प पडले आहेत. अशात आदिवासी समाजाची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींना अन्नधान्य वाटपाचे नियोजन जाहीर केले आहे. परंतु हे नियोजन करताना विभागाने आदिवासींमध्येच भेदभाव केला आहे. राज्यातील अशा अनेक जिल्ह्यात जिथे आदिवासींची लोकसंख्या आहे, अशाही जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींना अन्नधान्य वाटपाचे नियोजन जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा येथील फक्त कातकरी जमातीच्याच १.६ लाख कुटुंबांना तांदूळ, नागली, वरईचे ५ किलोचे वाटप करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २०१९-२० च्या रोजगार हमी योजनेवरील जॉब होल्डर इतर अशा २.६ लाख आदिवासींना ५ किलो गहू/तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील मनरेगा अंतर्गत १०० दिवस काम केलेल्या ७२०८ आदिवासींना गहू अथवा चना वाटप करण्यात येणार आहे. तर यवतमाळ, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यातील फक्त कोलाम आणि माडिया जमातीच्या ५७ हजार आदिवासींना फक्त २.५ किलो तूर किंवा चना वाटप करण्यात येणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेंतर्गत अन्नधान्य वाटपाच्या नियोजनावर आदिवासी समाजाच्या संघटनांनी आक्षेप घेतला आहे.विदर्भात आदिवासी जनसंख्या मोठ्या प्रमाणात आहे; मात्र शासनाने त्यात भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्याचा समावेश धान्य वाटप योजनेत केलेला नाही. तसेच महाराष्ट्र राज्यात प्रमुख ४५ जमाती व त्यांच्या उपजमाती वास्तव्यास आहेत. मात्र वाटप करताना काही जमातींचा समावेश केला व अन्य जमातींना डावलण्यात आले आहे. तसेच निकष ठरविताना एकसूत्रता ठेवण्यात आली नसल्याचाही आरोप केला आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्याला प्रकल्प कार्यालयातून अर्ज आणायचा आहे. त्यासाठी त्याला सरपंचाचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय हे धान्य कुठना आणि कसे मिळेल, यासंदर्भातही काही दिशानिर्देश दिलेले नाहीत.

 लॉकडाऊनमुळे आधीच हलाखीचे जीवन जगणारे आदिवासी बांधव रोजगार नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना मदत करणे सोडून आदिवासी विकास विभाग भेदभावपूर्ण मदत योजना राबवून त्यांची थट्टा करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रकल्प कार्यालयात जाणे, कागदपत्रे जमा करणे हे आदिवासींना अवघड आहे. आदिवासी विभागाचे स्वतंत्र बजेट आहे, त्यातून सर्वच आदिवासींना मदत करण्याची गरज आहे. धान्य वाटप निकषात तात्काळ बदल करण्याची गरज आहे.दिनेश शेराम, अध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर विभाग

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना