शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

राज्यातील वृक्षलागवड मोहीम यंदाही उद्दिष्टाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी ...

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अस्तित्वात आणली. त्यात पाच वर्षांसाठी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असले, तरी यंदाही ही योजना उद्दिष्टाविनाच राबविली जात आहे. कोरोना संक्रमणामुळे सलग दोन वर्षांपासून ही योजना दुर्लक्षित झाली आहे.

भाजप-सेना युतीच्या काळामध्ये २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीची योजना राबविण्यात आली होती. त्याची उद्दिष्टपूर्ती करून गिनीज बुकमध्येही नोंद झाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी २०२० ते २०२४ या काळात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना राबविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी वर्षाला १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, पुढील घटनाक्रमात राठोड यांचे मंत्रिपद गेले. कोरोनामुळे योजना प्रभावित झाली. यंदा तर वृक्षलागवडीचे उद्दिष्टच आखून देण्यात आलेले नाही. असे असले तरी नियमित योजनांच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.

...

सामाजिक वनीकरण आघाडीवर

जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेमध्ये यंदा नागपूर विभाग सामाजिक वनीकरण आघाडीवर आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्ह्यात १३ ठिकाणी १९ नर्सरी असून, यातून १ लाख ३० हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. सर्व रोपवाटिकांमध्ये २० ते २५ प्रजातींची झाले उपलब्ध असून, या आठवड्यापर्यंत एक लाख तीन हजार रोपट्यांची लागवड सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ग्रापमंचायतींनाही दरवर्षी साडेसात ते आठ लाख रोपांचा पुरवठा विभागाकडून केला जातो, अशी माहिती विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांनी दिली आहे.

...

नागपूर वनविभागाकडून २० हजार वृक्षलागवड

नागपूर वन परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मोहिमेत आतापर्यंत २० हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. वन विभागाच्या १५ नर्सरींमध्ये ८ लाख रोपे असून, १८ महिन्यांवरील २ लाख, तर ९ महिन्यांवरील ६ लाख रोपे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

...

शेतात बांधावर वृक्षलागवड अनुदान योजनाही सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून अनुदानच आलेले नाही. संसर्गजन्य महामारीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कित्येकांना प्राणास मुकावे लागले.