शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली

By admin | Updated: February 3, 2017 02:38 IST

लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली.

५ जण गंभीर जखमी : २० जणांना किरकोळ दुखापतकळमेश्वर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही ट्रॅव्हल्स उलटली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, अन्य २० जणांना किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - १४ मैल बायपास मार्गावरील चौकात गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींमध्ये गुणवंता ढोमणे (५४), परितोष बांगडकर (१८), महादेव टेकाडे (४६), रमेश रेवतकर सर्व रा. नरखेड यांच्यासह अन्य एकाचा समावेश असून, या पाचही जणांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या अपघातात आकाश खोडे (१४, रा. सावंगी, जिल्हा वर्धा), नामदेव रेवतकर (५९, रा. नरखेड), कृष्णाजी बारई (६०, रा. फेटरी) यांच्यासह अन्य १७ जणांना किरकोळ दुखापत झाली असून, या सर्वांवर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व काही वेळाने त्यांना सुटी देण्यात आली. नरखेड येथील शंकरराव टेकाडे यांचा मुलगा अमित टेकाडे याचा लग्नसमारंभ नागपूर येथे असल्याने संपूर्ण वऱ्हाडी एमएच-३१/इएम-०८७६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने नरखेडहून नागपूरला जात होते. ते नरखेडहून सकाळी ७ वाजता निघाले होते. ही ट्रॅव्हल्स कळमेश्वर - १४ मैल मार्गावरील बायपास चौकात पोहोचताच मागून भरधाव येणाऱ्या एमएच-४६/एफ-५१९५ क्रमांकाच्या टँकरने या ट्रॅव्हल्सला मागून जोरदार धडक दिली. त्यात पाच जण गंभीर व २० जण किरकोळ जखमी झाले. किंचाळण्याच्या आवाजामुळे एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या कामगारांनी सर्व जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले. गंभीर जखमींना नागपूरला हलविले तर किरकोळ जखमींना सुटी दिली. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्षकळमेश्वर बायपासवरील या चौकात वारंवार अपघात होतात. कारण, वाहनचालक कशाचीही तमा न बाळगता वेगात वाहने नेतात. याच ठिकाणी चार दिवसांपूर्वी अपघात झाला असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी या ठिकाणी दोन ट्रकची धडक झाली होती. त्यामुळे या चौकातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले होते. परंतु, बांधकाम विभागाने या चौकात गतिरोधक तयार करण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.