शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

ग्रामगीतेचा प्रवास; व्यक्तीपासून विश्वापर्यंत

By admin | Updated: October 19, 2015 03:17 IST

ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

मान्यवरांचे मत : ‘ग्रामगीतेची शब्दश्रीमंती’ महाग्रंथाचे प्रकाशननागपूर : ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान, तारा प्रकाशन साकोली, मराठी बोली साहित्य संघ नागपूरतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या षष्ठ्यब्दपूर्तीनिमित्त भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित ग्रामगीतेची शब्दश्रीमंती या महाग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शंकरनगरातील धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी होते. ग्रंथावर भाष्य करण्यासाठी डॉ. रत्नाकर भेलकर, डॉ. चंदू पाखरे उपस्थित होते. व्यासपीठावर कोमल ठाकरे, डॉ. राजन जयस्वाल उपस्थित होते. ग्रंथावर भाष्य करताना डॉ. रत्नाकर भेलकर म्हणाले, बोरकर यांचा ग्रंथ भाषाशास्त्राशी निगडित ग्रंथ आहे. व्याकरणाची दिशा अनुसरून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून ग्रामगीतेचा शब्दकोश या ग्रंथाचे मूळ आहे. ग्रामगीतेच्या भाषेत प्रवाहीपणा आहे. यातील शब्द चौकस रीतीने वापरण्यात आलेले असून ग्रामगीतेतील शब्दशक्तीला वैश्विक भान आहे. डॉ. चंदू पाखरे म्हणाले, मोठमोठ्या व्यक्तींनी ग्रामगीतेला प्रस्तावना लिहिली यावरून ग्रामगीतेची महती लक्षात येते. गाव सुखी व्हावे हे तुकडोजी महाराजांचे ‘टार्गेट’ होते. शेतकऱ्यांचा आसूड आणि ग्रामगीता घरी असल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आजपर्यंत शब्दकोश या शब्दाला समानार्थी शब्द नव्हता. तो समानार्थी शब्द या ग्रंथाच्या रूपाने मिळाला आहे. संचालन विजया मारोतकर यांनी केले. आभार डॉ. राजन जयस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)