शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

ग्रामगीतेचा प्रवास; व्यक्तीपासून विश्वापर्यंत

By admin | Updated: October 19, 2015 03:17 IST

ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

मान्यवरांचे मत : ‘ग्रामगीतेची शब्दश्रीमंती’ महाग्रंथाचे प्रकाशननागपूर : ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान, तारा प्रकाशन साकोली, मराठी बोली साहित्य संघ नागपूरतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या षष्ठ्यब्दपूर्तीनिमित्त भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित ग्रामगीतेची शब्दश्रीमंती या महाग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शंकरनगरातील धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी होते. ग्रंथावर भाष्य करण्यासाठी डॉ. रत्नाकर भेलकर, डॉ. चंदू पाखरे उपस्थित होते. व्यासपीठावर कोमल ठाकरे, डॉ. राजन जयस्वाल उपस्थित होते. ग्रंथावर भाष्य करताना डॉ. रत्नाकर भेलकर म्हणाले, बोरकर यांचा ग्रंथ भाषाशास्त्राशी निगडित ग्रंथ आहे. व्याकरणाची दिशा अनुसरून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून ग्रामगीतेचा शब्दकोश या ग्रंथाचे मूळ आहे. ग्रामगीतेच्या भाषेत प्रवाहीपणा आहे. यातील शब्द चौकस रीतीने वापरण्यात आलेले असून ग्रामगीतेतील शब्दशक्तीला वैश्विक भान आहे. डॉ. चंदू पाखरे म्हणाले, मोठमोठ्या व्यक्तींनी ग्रामगीतेला प्रस्तावना लिहिली यावरून ग्रामगीतेची महती लक्षात येते. गाव सुखी व्हावे हे तुकडोजी महाराजांचे ‘टार्गेट’ होते. शेतकऱ्यांचा आसूड आणि ग्रामगीता घरी असल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आजपर्यंत शब्दकोश या शब्दाला समानार्थी शब्द नव्हता. तो समानार्थी शब्द या ग्रंथाच्या रूपाने मिळाला आहे. संचालन विजया मारोतकर यांनी केले. आभार डॉ. राजन जयस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)