शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

टॅक्स, टोल व डिझेल दराच्या ओझ्याखाली दबले ट्रान्सपोर्टर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:49 IST

Nagpur News डिझेलच्या वाढत्या दरासह टॅक्स आणि टोलच्या ओझ्याखाली ट्रान्सपोर्टर्स दबले असून, सध्या रस्त्यावर धावत असलेले ५० टक्के ट्रक पुढे धावणार वा नाहीत, अशी भीती ट्रान्सपोर्टर्सला आहे.

ठळक मुद्दे केंद्र व राज्याने आर्थिक पॅकेज द्यावेतर ट्रक रस्त्यावर धावणे बंद होणार

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डिझेलच्या वाढत्या दरासह टॅक्स आणि टोलच्या ओझ्याखाली ट्रान्सपोर्टर्स दबले असून, सध्या रस्त्यावर धावत असलेले ५० टक्के ट्रक पुढे धावणार वा नाहीत, अशी भीती ट्रान्सपोर्टर्सला आहे.

गाडी खरेदी करताना रोड टॅक्सचा भरणा पूर्वीच करावा लागतो. कमी ट्रक रस्त्यावर धावत असल्याने आणि या व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने कुणीही नवीन ट्रक खरेदीच्या मनस्थितीत नाही. निरंतर रोजगार मिळत नसल्याने अनेक ड्रायव्हर आणि क्लिनर कामावर येत नाहीत. सध्या त्यांचाही तुटवडा जाणवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने दुपारी ४ वाजता बंद होत असल्याने अनेक दुकानदारांनी माल बोलविणे बंद केले आहे. त्यामुळे बरीच मालवाहतूक थांबली आहे. त्याचाही फटका ट्रान्सपोर्टर्सला बसला आहे.

वर्षभरात डिझेलचे दर प्रति लिटर ३० रुपयांनी वाढून ९५.५४ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीनंतरही मालवाहतुकीचे भाडे वाढले नाही. पूर्वी मुंबईपर्यंत भाड्याचे १० हजार रुपये मिळायचे. डिझेलचे दर वाढल्यानंतरही तेवढेच भाडे मिळत आहे. मुंबईपर्यंतच्या मार्गावर ट्रकचालकाला जवळपास १५०० हजार रुपये टोल द्यावा लागतो. मालवाहतुकीचे दर कमी मिळत आहेत, त्यानंतर कुणीही ग्राहक सोडण्यास तयार नाही. ट्रक रस्त्यावर धावावा, या उद्देशाने कमी दरातही मालवाहतूक करीत असल्याचे ट्रॅकर्स युनिटी नागपूरचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी सांगितले.

ट्रकला ५० टक्के डिझेलचा खर्च

मालवाहतूक करताना ट्रकला जवळपास ५० टक्के डिझेलचा खर्च येतो. त्यामुळे जास्त अंतरावर नफा ना तोटा, तत्त्वावर ट्रक न्यावे लागतात. पण कमी अंतरासाठी वाहतूकदारांना खिशातून पैसे टाकावे लागतात. तसे पाहता डिझेलच्या वाढत्या किमतीनुसार ट्रकचे प्रति टन भाडे ५०० ते ६०० रुपयांनी वाढले आहे. ट्रक मालकाला २५ ते ३० टक्के भाडेवाढ हवी आहे. पण सध्या ५ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतरही वाढीव भाडे ग्राहक देत नाहीत. हा व्यवसाय पूर्णपणे संकटात आहे. केंद्र आणि राज्य शासनाने या व्यवसायाला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी मारवाह यांनी केली. डिझेलच्या वाढत्या किमतीनुसार मुंबईचे भाडे २ हजार रुपये प्रति टन, दिल्ली ३,८०० रुपये, कोलकाता ४,२०० रुपये, चेन्नई ४,४०० रुपये आणि हैदराबाद १,८०० रुपये अशी वाढ झाली आहे. पण वाढीव भाडे देण्यास कुणीही तयार नाही.

जीएसटीच्या टप्प्यात आणावे पेट्रोल व डिझेल

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या टप्प्यात आणावे. त्यामुळे दरवाढीवर नियंत्रण येईल. इंधनावर लागणारे अतिरिक्त कर रद्द करावेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टर्सला दिलासा मिळेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका