शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मर दुरुस्त व्हायला लागताहेत १५ दिवस; कसे होणार सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:59 IST

Nagpur News agriculture शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरेसे, तरीही शेतकरी चिंतेत२० ट्रान्सफार्मर जळाले२६०० एकूण ट्रान्सफार्मर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफार्मर खराब झाल्यावर ते दुरुस्त करण्यासाठी जवळपास १५-१५ दिवस लागत आहे. दुसरीकडे कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनसााठी लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर बिघडण्याचे प्रमाणही ३.५ टक्केवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेताला पाणी देऊ शकत नाही. पुरेसे पाणी असूनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

जिल्ह्यात कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनची संख्या जवळपास ८५ हजार इतकी आहे. त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ७००० ट्रान्सफार्मर लागले आहेत. जर ट्रान्सफार्मर खराब झाला तर ते दुरुस्त करणे कठीण असते. महावितरणच म्हणणे आहे की, शेतकरी अनेकदा आपल्या शेतात डीपी लावू देत नाही. नागपूर जिल्ह्यात मराठवाडा व पश्चिम विदर्भासारखी समस्या नाही. तरी ट्रान्सफार्मर फेल होत असल्याची समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे एचव्हीडीएस कनेक्शन घेणारे शेतकरी जास्त त्रस्त आहेत. या योजनेंतर्गत १६ केव्हीचा एक ट्रान्सफार्मरवर जास्तीत जास्त दोन कृषी पंप कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु हे ट्रान्सफार्मर फेल झाल्यावर ते दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत.

१४ एजन्सींकडे आहे दुरुस्तीचे काम

नाागपूर जिल्ह्यात एचव्हीडीएस कनेक्शनची संख्या २६०० इतकी आहे. योजनेंतर्गत लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर खराब झाल्यास, किंवा जळाल्यास मोठे संकट निर्माण होते. असे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची जबाबदारी १४ एजन्सींकडे सोपवण्यात आली आहे. जर ट्रान्सफार्मर शेतावरच दुरुस्त झाला नाही तर त्याला ठिक करण्यासाठी १५ दिवस लागतात. या कालावधीत शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून शकत नाही.

अखंडित पुरवठ्याचा प्रयत्न

जिल्ह्यात कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही समस्या नाही. दूरवरच्या भागात लागलेल्या पारंपारिक वीज कनेक्शनमध्ये त्रुटी आल्यास त्याला दोन दिवसात ठिक केले जाते.

नारायण अमझरे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :agricultureशेती