शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निवडणुकांच्या काळात बंगालमध्ये बदल्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे पहिले तीन टप्पे आटोपले असून, निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेल्या बदल्यांवरूनदेखील राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे पहिले तीन टप्पे आटोपले असून, निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेल्या बदल्यांवरूनदेखील राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बदल्यांचे हे सत्र सुरूच असून आयोगाने कोलकात्यातील आठ विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना हटविले आहे. या मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

चौरंगी, एन्टाली, भवानीपूर, बेलियाघाट, जोडासांको, शामपुकूर, काशीपूर-बेलगछिया व कोलकाता पोर्ट या विधानसभा मतदारसंघात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्या एका नियमित प्रक्रियेंतर्गत झाल्या आहेत. हे अधिकारी तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी होते, निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी मोठी भूमिका पार पाडतात. या अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी दिली. या अधिकाऱ्यांविरोधात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसची बाजू घेण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.