शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बाेगद्यातून नव्हे, पुलावरून धावणार रेल्वे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू होताच, नागरिकांमध्ये मोठी रेल्वेलाइन आणि अगिनगाडीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यातच उमरेड-शिवापूर मार्गालगत ५ ते ७ मीटर खोल खोदकाम केल्याने उमरेडच्या काही परिसरातून रेल्वे पुलाखालून जाणार याबाबतही कमालीची चर्चा परिसरात होती. आता या कामात अंशत: बदल झाला असून, या परिसरातून रेल्वे पुलाखालून (बोगद्यातून) नव्हे तर पुलावरून धावणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २१ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार अशी अधिसूचना डिसेंबर २०२०ला निर्गमित करण्यात आली होती. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले. असे असले तरी एकूणच कामाची परिस्थिती बघता आणि तक्रारीची बाब लक्षात घेता ठरावीक कालावधीत रेल्वेचे काम पूर्णत्वास येणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विकासकामात खोळंबा निर्माण झाल्याने आणि नागरिकांची गैरसोय होणार असल्याने याप्रकरणी आता चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

भिवापूरलगत आंभोरा जुन्या मार्गालगत तसेच कारगाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात पुलावरून रेल्वे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. यात कोणताही बदल नाही. सोबतच उमरेड-शिवापूर मार्गालगत बोगद्यातून रेल्वे धावणार होती. परिसरात मोठे नाले, तलाव असल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. आता या परिसरात पूल उभारला जाणार आहे.

.....

लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?

बऱ्याच वर्षांपासून ब्रॉडगेज रेल्वेची मागणी होती. यासाठी निवेदने, चर्चा, उपोषणे, रेल रोको, आंदोलने झालीत. वर्तमानपत्रांनीही दखल घेत समस्येला वाचा फोडली. निधी मंजूर होत कामालाही प्रारंभ झाला. आता अवैध वृक्षतोड प्रकरणावरून वन्यजीव-वनविभागाने कागदी घोडे नाचविले. कोरोनासदृश परिस्थिती असल्यामुळे नागरिक गप्प आहेत. पूर्ववत स्थिती आल्यास नागरिकांची ओरड नक्की होणार. कमी रकमेत, झटपट प्रवास गोरगरीब-सर्वसामान्यांसह साऱ्यांनाच परवडणारा राहील. शिवाय, व्यापारी-उद्योजकांसाठीही रेल्वे सुखदायी ठरणार आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या थांबलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, प्रकरण गंभीरतेने घेतील काय, असा सवाल विचारला जात आहे.