शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

बाेगद्यातून नव्हे, पुलावरून धावणार रेल्वे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू होताच, नागरिकांमध्ये मोठी रेल्वेलाइन आणि अगिनगाडीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यातच उमरेड-शिवापूर मार्गालगत ५ ते ७ मीटर खोल खोदकाम केल्याने उमरेडच्या काही परिसरातून रेल्वे पुलाखालून जाणार याबाबतही कमालीची चर्चा परिसरात होती. आता या कामात अंशत: बदल झाला असून, या परिसरातून रेल्वे पुलाखालून (बोगद्यातून) नव्हे तर पुलावरून धावणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २१ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार अशी अधिसूचना डिसेंबर २०२०ला निर्गमित करण्यात आली होती. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले. असे असले तरी एकूणच कामाची परिस्थिती बघता आणि तक्रारीची बाब लक्षात घेता ठरावीक कालावधीत रेल्वेचे काम पूर्णत्वास येणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विकासकामात खोळंबा निर्माण झाल्याने आणि नागरिकांची गैरसोय होणार असल्याने याप्रकरणी आता चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

भिवापूरलगत आंभोरा जुन्या मार्गालगत तसेच कारगाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात पुलावरून रेल्वे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. यात कोणताही बदल नाही. सोबतच उमरेड-शिवापूर मार्गालगत बोगद्यातून रेल्वे धावणार होती. परिसरात मोठे नाले, तलाव असल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. आता या परिसरात पूल उभारला जाणार आहे.

.....

लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?

बऱ्याच वर्षांपासून ब्रॉडगेज रेल्वेची मागणी होती. यासाठी निवेदने, चर्चा, उपोषणे, रेल रोको, आंदोलने झालीत. वर्तमानपत्रांनीही दखल घेत समस्येला वाचा फोडली. निधी मंजूर होत कामालाही प्रारंभ झाला. आता अवैध वृक्षतोड प्रकरणावरून वन्यजीव-वनविभागाने कागदी घोडे नाचविले. कोरोनासदृश परिस्थिती असल्यामुळे नागरिक गप्प आहेत. पूर्ववत स्थिती आल्यास नागरिकांची ओरड नक्की होणार. कमी रकमेत, झटपट प्रवास गोरगरीब-सर्वसामान्यांसह साऱ्यांनाच परवडणारा राहील. शिवाय, व्यापारी-उद्योजकांसाठीही रेल्वे सुखदायी ठरणार आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या थांबलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, प्रकरण गंभीरतेने घेतील काय, असा सवाल विचारला जात आहे.