शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बाेगद्यातून नव्हे, पुलावरून धावणार रेल्वे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : ब्रिटिशांच्या काळातील ‘शंकुतला’ची झुकझुक थांबल्यानंतर आणि डिसेंबर २०२० ला नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू होताच, नागरिकांमध्ये मोठी रेल्वेलाइन आणि अगिनगाडीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यातच उमरेड-शिवापूर मार्गालगत ५ ते ७ मीटर खोल खोदकाम केल्याने उमरेडच्या काही परिसरातून रेल्वे पुलाखालून जाणार याबाबतही कमालीची चर्चा परिसरात होती. आता या कामात अंशत: बदल झाला असून, या परिसरातून रेल्वे पुलाखालून (बोगद्यातून) नव्हे तर पुलावरून धावणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे १५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २१ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार अशी अधिसूचना डिसेंबर २०२०ला निर्गमित करण्यात आली होती. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले. असे असले तरी एकूणच कामाची परिस्थिती बघता आणि तक्रारीची बाब लक्षात घेता ठरावीक कालावधीत रेल्वेचे काम पूर्णत्वास येणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विकासकामात खोळंबा निर्माण झाल्याने आणि नागरिकांची गैरसोय होणार असल्याने याप्रकरणी आता चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

भिवापूरलगत आंभोरा जुन्या मार्गालगत तसेच कारगाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात पुलावरून रेल्वे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. यात कोणताही बदल नाही. सोबतच उमरेड-शिवापूर मार्गालगत बोगद्यातून रेल्वे धावणार होती. परिसरात मोठे नाले, तलाव असल्याने या निर्णयात बदल करण्यात आला. आता या परिसरात पूल उभारला जाणार आहे.

.....

लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?

बऱ्याच वर्षांपासून ब्रॉडगेज रेल्वेची मागणी होती. यासाठी निवेदने, चर्चा, उपोषणे, रेल रोको, आंदोलने झालीत. वर्तमानपत्रांनीही दखल घेत समस्येला वाचा फोडली. निधी मंजूर होत कामालाही प्रारंभ झाला. आता अवैध वृक्षतोड प्रकरणावरून वन्यजीव-वनविभागाने कागदी घोडे नाचविले. कोरोनासदृश परिस्थिती असल्यामुळे नागरिक गप्प आहेत. पूर्ववत स्थिती आल्यास नागरिकांची ओरड नक्की होणार. कमी रकमेत, झटपट प्रवास गोरगरीब-सर्वसामान्यांसह साऱ्यांनाच परवडणारा राहील. शिवाय, व्यापारी-उद्योजकांसाठीही रेल्वे सुखदायी ठरणार आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या थांबलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, प्रकरण गंभीरतेने घेतील काय, असा सवाल विचारला जात आहे.