शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नाल्यातील खड्ड्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

मनोज झाडे हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत ...

मनोज झाडे

हिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत (११) व अभिषेक नामदेव राऊत (९) अशी मृत मुलांची नावे आहे. हिंगणा तालुक्यातील (जि.नागपूर) येथे दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी वीटभट्टी चालक सुरेश मलिये व स्वदीप मलिये (रा. सावंगी देवळी) यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.

एमआयडीसीच्या इंदिरामातानगर येथील राज पांडे या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना तालुक्यात दोन मुले बेपत्ता असल्याचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणेची सोमवारी सकाळी तारांबळ उडाली होती.

रविवारी (दि.१३) दुपारनंतर ३ वाजता आरुषी आणि अभिषेक खेळण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांची आई कामावर गेली होती, तर वडील बाहेर होते. सायंकाळी मुलांची आई पुष्पा कामावरून परत आल्यानंतर मुले घरी नव्हती. तिने आजूबाजूला शोध घेतला मात्र मुले आढळली नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मुलाचा शोध घेतला. मात्र, कुठेही पत्ता लागली नाही. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने राऊत कुटुंबीयांनी शोधकार्य सुरू केले. गावालगतच्या नाल्यात दोन्ही मुलांचे कपडे व चप्पल दिसताच ग्रामस्थांनी तातडीने हिंगणा पोलिसांना याबाबत अवगत केले.

यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिण दुर्गे यांच्या सूचनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे पोलीस ताफ्यासह सावंगी देवळी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दाखल झाले. पोलिसांनी पाणी भरलेल्या मोठ्या खड्ड्यात ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र, या खड्ड्यात १५ ते २० फूट पाणी व गाळ असल्यामुळे कोणीही आत उतरायला तयार नव्हते. शेवटी अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दल वेळेत पोहोचले नसल्याने गावातील काही युवक खड्ड्यात उतरले. येथे गाळात मुलांचे मृतदेह असल्याचे त्यांना खात्री पटली. मात्र, गाळात कुणी उतरण्यात तयार नसल्याने जेसीबी बोलावून खड्ड्यासमोरील बांध तोडून पाणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ११.५८ वाजेदरम्यान मोहन पारसे, गंगाधर नगरे या युवकाने आरुषीचा तर १२.२० वाजतादरम्यान अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

===Photopath===

140621\20210614_122418.jpg

===Caption===

घटनाष्टलावरील गर्दी