शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:01 IST

राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे.

ठळक मुद्दे ‘लाईव्ह’ प्रसंगांनी नाटकात आणली बहार५९ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीर आणि काश्मीरमधील घडामोडींबाबत अनभिज्ञ आहेत, असे साधारणत: अभावानेच सापडतील. भलेही तेथील वास्तविकतेचे मर्म कुणालाही कळणार नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये भारत सरकारने रद्द केलेल्या ‘कलम ३७०’मुळे तर अनेकांच्या आनंदाला धुमारे फुटले आहेत. मात्र, स्थानिक खरेच या घटनेबाबात काय विचार करतात, याचा विचार कुणीच करू इच्छित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीचा वेध घेणारे नाटक म्हणजे ‘किश्त बहार’. राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. काहीअंशी हा प्रयत्न यशस्वी ठरला असला तरी कथानकात जे पूर्णत्व हवे, प्राप्त होत नाही. अर्थात, नाट्य सादरीकरणाला अनेक मर्यादा असल्याने कदाचित ते असू शकते.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नागपूर केंद्रावर लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मंगळवारी सलीम शेख लिखित व दिग्दर्शित ‘किश्त बहार’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. नाटकाची सुरुवात किश्तवाडमधील नाराज काश्मिरींच्या कुप्रसिद्ध अशा दगडफेकीपासून होते. दूरचित्रवाणीवर असे प्रसंग घरबसल्या अनेकांनी बघितले आहेत. अशाच घटनेत सापडलेली काश्मिरी पंडित मुलगी आयेशा भट (आयेशा शेख) व अनेक संकटे झेलूनही आनंद मानणाऱ्या तिच्या कुटुंबीयांभोवती हे नाटक पूर्णत: केंद्रित आहे. त्याला पाकिस्तानधार्जिणा अलगाववाद, काश्मिरींना हवी असलेली स्वत:ची आझादी आणि या सगळ्यात कोणताही प्रश्न उपस्थित न करता जात, पंथ, धर्म आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक संघर्षाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सोबतीला प्रेमकथेची जोडही आहे. कथा रंजक आहे आणि कदाचित मयताच्या टाळूवर पोळी शेकणाºया राजकारण्यांच्या आणि मोबाईलवर कसलाही विचार न करता कलम ३७० रद्द झाल्यानंतर घरबसल्या काश्मिरींवर लज्जास्पद जोक्स तयार करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.भारत, काश्मीर आणि प्रेम करावा असा निसर्ग यावरील संवाद टाळ्या घेणाºया ठरल्या. नाटकात बर्फवृष्टी, झिल, बर्फाच्छादित पर्वत, भारत-पाकिस्तान सीमा आणि बॉम्बस्फोट यांचे लाईव्ह दर्शन करवून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिलेला धक्का सुखावणारा आहे. या सगळ्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये ३७० कलमबाबत जादा वाच्यता केली असती तर नाटकाचे सार्थक झाले असते. एवढी उणीव सोडली तर नाटक कसलेले आहे. एकूणच काय तर देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या या नाटकाच्या सुखद समारोपानंतर ‘भारत माता की जय’ असा जयघोष प्रेक्षागृहातून निघणारच. नाटकात संध्या भट्ट (संयुक्ता थोरात), सैनिक राशिद (सचिन गिरी), रंजित भट्ट (सलीम शेख), संजित भट्ट (आदेश जामनिक), गिलानी व खान (परीक्षित हरसोले), नूर (भाग्यश्री देठे), कमांडर (रोहित गिल), भाभी (रुचिता पडिया), भाई (मंगेश रौराळे), जफर (लकी वानखेडे), अतिक (पंकज काळे), आफताब (सुशील शेंडे), साहिल (तुषार सोयम), सैनिक (प्रिन्स पाटील व राहुल चव्हाण) यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना मिथून मित्रा, पार्श्वसंगीत हेमंत डिके, नेपथ्य सौरभ दास व राजेश काळे, रंगभूषा नलिनी बन्सोड, वेशभूषा अश्विनी पिंपळकर यांची होती. सूत्रधार म्हणून पूजा पिंपळकर यांनी सूत्र सांभाळले.

टॅग्स :artकला