शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:01 IST

राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे.

ठळक मुद्दे ‘लाईव्ह’ प्रसंगांनी नाटकात आणली बहार५९ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीर आणि काश्मीरमधील घडामोडींबाबत अनभिज्ञ आहेत, असे साधारणत: अभावानेच सापडतील. भलेही तेथील वास्तविकतेचे मर्म कुणालाही कळणार नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये भारत सरकारने रद्द केलेल्या ‘कलम ३७०’मुळे तर अनेकांच्या आनंदाला धुमारे फुटले आहेत. मात्र, स्थानिक खरेच या घटनेबाबात काय विचार करतात, याचा विचार कुणीच करू इच्छित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीचा वेध घेणारे नाटक म्हणजे ‘किश्त बहार’. राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. काहीअंशी हा प्रयत्न यशस्वी ठरला असला तरी कथानकात जे पूर्णत्व हवे, प्राप्त होत नाही. अर्थात, नाट्य सादरीकरणाला अनेक मर्यादा असल्याने कदाचित ते असू शकते.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नागपूर केंद्रावर लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मंगळवारी सलीम शेख लिखित व दिग्दर्शित ‘किश्त बहार’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. नाटकाची सुरुवात किश्तवाडमधील नाराज काश्मिरींच्या कुप्रसिद्ध अशा दगडफेकीपासून होते. दूरचित्रवाणीवर असे प्रसंग घरबसल्या अनेकांनी बघितले आहेत. अशाच घटनेत सापडलेली काश्मिरी पंडित मुलगी आयेशा भट (आयेशा शेख) व अनेक संकटे झेलूनही आनंद मानणाऱ्या तिच्या कुटुंबीयांभोवती हे नाटक पूर्णत: केंद्रित आहे. त्याला पाकिस्तानधार्जिणा अलगाववाद, काश्मिरींना हवी असलेली स्वत:ची आझादी आणि या सगळ्यात कोणताही प्रश्न उपस्थित न करता जात, पंथ, धर्म आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक संघर्षाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सोबतीला प्रेमकथेची जोडही आहे. कथा रंजक आहे आणि कदाचित मयताच्या टाळूवर पोळी शेकणाºया राजकारण्यांच्या आणि मोबाईलवर कसलाही विचार न करता कलम ३७० रद्द झाल्यानंतर घरबसल्या काश्मिरींवर लज्जास्पद जोक्स तयार करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.भारत, काश्मीर आणि प्रेम करावा असा निसर्ग यावरील संवाद टाळ्या घेणाºया ठरल्या. नाटकात बर्फवृष्टी, झिल, बर्फाच्छादित पर्वत, भारत-पाकिस्तान सीमा आणि बॉम्बस्फोट यांचे लाईव्ह दर्शन करवून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिलेला धक्का सुखावणारा आहे. या सगळ्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये ३७० कलमबाबत जादा वाच्यता केली असती तर नाटकाचे सार्थक झाले असते. एवढी उणीव सोडली तर नाटक कसलेले आहे. एकूणच काय तर देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या या नाटकाच्या सुखद समारोपानंतर ‘भारत माता की जय’ असा जयघोष प्रेक्षागृहातून निघणारच. नाटकात संध्या भट्ट (संयुक्ता थोरात), सैनिक राशिद (सचिन गिरी), रंजित भट्ट (सलीम शेख), संजित भट्ट (आदेश जामनिक), गिलानी व खान (परीक्षित हरसोले), नूर (भाग्यश्री देठे), कमांडर (रोहित गिल), भाभी (रुचिता पडिया), भाई (मंगेश रौराळे), जफर (लकी वानखेडे), अतिक (पंकज काळे), आफताब (सुशील शेंडे), साहिल (तुषार सोयम), सैनिक (प्रिन्स पाटील व राहुल चव्हाण) यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना मिथून मित्रा, पार्श्वसंगीत हेमंत डिके, नेपथ्य सौरभ दास व राजेश काळे, रंगभूषा नलिनी बन्सोड, वेशभूषा अश्विनी पिंपळकर यांची होती. सूत्रधार म्हणून पूजा पिंपळकर यांनी सूत्र सांभाळले.

टॅग्स :artकला