शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद

By admin | Updated: September 19, 2014 00:53 IST

एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही

नागपूर : एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही वाहतूक सिग्नल बंद असल्याने तसेच काही सिग्नलचे टायमर बंद असल्याने त्याचा वाहनचालकांना फटका बसतो आहे.सिव्हील लाईन्समध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. कार्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या भागातील रस्त्यावर वर्दळ असते. नेमके त्याच वेळी जीपीओ चौकातील सिग्नल बंद असतो. या मार्गावरील वाहनांची गर्दी लक्षात घेतली तर अपघाताचा धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पोलीस आणि महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने या मार्गावरून जात असतात. तरीही त्याची दखल घेतली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावती मार्गावरील बोले पेट्रोलपंपाजवळील सिग्नल कधी सुरू तर कधी बंद असतो. त्यापुढे गेल्यावर धरमपेठ शाळेजवलील सिग्नलचीही हीच स्थिती आहे. दक्षिणपश्चिम नागपूरमधील रिंगरोडवरील पडोळेनगर चौकातील सिग्नलचे काही दिवे बंद आहेत. त्यामुळे गोपालनगरकडून येणाऱ्या नागरिकांना सिग्नल सुरू केव्हा होतो आणि बंद केव्हा होतो हे कळतच नाही. स्वत:च अंदाज बांधून वाहने काढावी लागते.हा रस्ता दिवसरात्र वाहता असतो आणि सूसाट वेगाने वाहने धावत असतात. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी चौकातून पुढे साईबाबा मंदिराकडे जाताना लागणाऱ्या सिग्नलची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कारागृहाजवळील सिग्नल सुरू कमी आणि बंद अधिक काळ असतो. अजनी चौकातील सिग्नलच्या दिव्यांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. देवनगर चौक, साईबाबा मंदिर चौकातील सिग्नलचे टायमर बंद आहे. कमी अधिक प्रमाणात शहरातील इतरही भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.बजाजनगरपासून शंकरनगरपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर होणाऱ्या कोंडीचा शाळेचे विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. मात्र त्याची दखल कुठल्याच पातळीवर घेतली जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. (प्रतिनिधी)