शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या क्लिष्ट तरतुदींमुळे देशातील व्यापारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १ जुलै २०१७ ला देशात लागू करण्यात आलेल्या ‘जीएसटी’मुळे देशाचा विकासदर व व्यापार वाढेल, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १ जुलै २०१७ ला देशात लागू करण्यात आलेल्या ‘जीएसटी’मुळे देशाचा विकासदर व व्यापार वाढेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र पावणेचार वर्षांत ‘जीएसटी’ कायद्यात एक हजारहून अधिक संशोधन केल्यानंतरदेखील या कायद्याचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसून येत नाही. यामुळे ‘कॅट’तर्फे (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) आणखी एका महिन्यासाठी ‘जीएसटी’विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. याअगोदर २६ फेब्रुवारीला देशव्यापी व्यापार बंद आंदोलन करण्यात आले होते.

सरकारने केलेल्या दाव्यांमुळे व्यापाऱ्यांनीदेखील ‘जीएसटी’चे खुल्यामनाने स्वागत केले होते. परंतु आता ते त्रस्त झाले आहेत. ‘रिटर्न’ भरण्यात थोडीशी चूक झाल्यावर व्यापाऱ्यांवर विलंब शुल्क, दंड, व्याज इत्यादींचे ओझे टाकल्या जात आहे. मात्र सरकार व्यापाऱ्यांची समस्या समजून घ्यायलाच तयार नाही. यामुळे ‘कॅट’ने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी पत्रपरिषदेत दिली. सरकार जर नवीन कायद्यात एक हजार संशोधन करू शकते, तर मग व्यापाऱ्यांकडून ‘रिटर्न’ भरताना क्षुल्लक चूक झाल्यावर माफ का केले जात नाही. ‘जीएसटी’ लागू झाल्यावर ‘इन्स्पेक्टर राज’ समाप्त होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र असे काहीच झालेले नाही. मार्च महिन्यातच व्यापाऱ्यांना १० ते १२ प्रकारचे ‘जीएसटी रिटर्न’ भरावे लागत आहे. व्यापाराकडे लक्ष देण्याऐवजी ‘सीए’ व ‘जीएसटी’ विभागात पायपीट करण्यातच वेळ जात आहे. ‘ई-वे बिल’च्या प्रकरणातदेखील हीच स्थिती आहे. बोगस रसिदीच्या नावाखाली कारवाईचा क्रम सुरू आहे. विविध कारणांमुळे वेगवेगळ्या ‘फर्म’, कंपन्यांच्या रसीद बनविण्यात येतात. मात्र सरकार त्याला गंभीरतेने घेत नाही, असे भरतीया यांनी सांगितले. पत्रपरिषदेत ‘कॅट’च्या नागपूर चमूचे किशोर धाराशिवकर, महामंत्री फारुख अकबानी, उपाध्यक्ष ज्योती अवस्थी, निखिलेश ठाकर, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.

एक महिना चालणार आंदोलन

‘जीएसटी’मुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रकरणात सरकारने केवळ आश्वासने व दाव्यांचा आधार घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘कॅट’ने ५ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशभरात आंदोलनाचे नियोजन केले आहे. एक दिवस धरणे आंदोलन करण्यात येईल. ‘जीएसटी’च्या त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी देशभरातील खासदार, आमदारांना पत्र लिहिण्यात येईल, सोबतच राष्ट्रपतींनादेखील ‘पोस्टकार्ड’ पाठविण्यात येतील. यात व्यापाऱ्याचे नाव, जीएसटी क्रमांक व फर्मचे नाव याचा समावेश असेल. या माध्यमातून ‘जीएसटी’त सुधारणा करण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाईल.