शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरनंतर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:39 IST

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकंपन्यांनी उत्पादन बंद करावे : जागरूकतेचे ‘कॅट’चे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला समर्थन देताना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशातील ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी कॅटचे सदस्य आहेत, हे विशेष.याकरिता कॅटने सहयोगी कंपनी ऑल इंडियन कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना २ ऑक्टोबरपूर्वी उत्पादन आणि तयार उत्पादनांची विक्री बंद करण्यासह पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांनी एकल प्लास्टिकची निर्मिती बंद केल्यास संपूर्ण देशातील वितरक, होलसेलर, रिटेलर्स आणि अन्य व्यापारी या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात यशस्वी होतील.संपूर्ण देशात ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी आहेत. त्यापैकी ५ लाख व्यापारी एफएमसीजी उत्पादनांचे वितरक म्हणून काम करतात. त्यांच्याशी ३० लाख किरकोळ व्यापारी जुळले आहेत. अखिल भारतीय धर्तीवर बहिष्कार टाकल्यास एकल प्लास्टिक निर्मिती बंद होईल.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, दैनिक उपयोगाच्या वस्तू, औषधांचे पॅकेजिंग आदींसाठी उपयोगात येणारे एकल प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर गंभीर असल्यामुळे त्यांनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक बंदीची अप्रत्यक्ष घोषणा केली होती. त्यामुळे उत्पादक, कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्पादनात अथवा तयार मालाच्या पॅकेजिंगसाठी एकल प्लास्टिकचा उपयोग करू नये.भरतीया म्हणाले, कॅट देशातील ४० हजारांपेक्षा जास्त ट्रेड असोसिएशन आणि फेडरेशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकऐवजी ज्यूट बॅगचा उपयोग करण्यावर जागरूक करण्यात येणार आहे. कॅटने २९ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशनच्या एका राष्ट्रीय संमेलनात या मुद्यावर चर्चा आणि भविष्यातील धोरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.एआयपीसीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे आवाहन पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एफएमसीजी आणि कन्झुमर ड्युरेबल कंपन्यांवर आहे. कारण सामान्यांतर्फे या उत्पादनांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यात येतो. कंपन्यांनी एकल प्लास्टिकसाठी पर्यायी योजना तयार करावी. वितरकांनी अखिल भारतीय स्तरावर पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी