शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरनंतर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:39 IST

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकंपन्यांनी उत्पादन बंद करावे : जागरूकतेचे ‘कॅट’चे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला समर्थन देताना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशातील ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी कॅटचे सदस्य आहेत, हे विशेष.याकरिता कॅटने सहयोगी कंपनी ऑल इंडियन कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना २ ऑक्टोबरपूर्वी उत्पादन आणि तयार उत्पादनांची विक्री बंद करण्यासह पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांनी एकल प्लास्टिकची निर्मिती बंद केल्यास संपूर्ण देशातील वितरक, होलसेलर, रिटेलर्स आणि अन्य व्यापारी या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात यशस्वी होतील.संपूर्ण देशात ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी आहेत. त्यापैकी ५ लाख व्यापारी एफएमसीजी उत्पादनांचे वितरक म्हणून काम करतात. त्यांच्याशी ३० लाख किरकोळ व्यापारी जुळले आहेत. अखिल भारतीय धर्तीवर बहिष्कार टाकल्यास एकल प्लास्टिक निर्मिती बंद होईल.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, दैनिक उपयोगाच्या वस्तू, औषधांचे पॅकेजिंग आदींसाठी उपयोगात येणारे एकल प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर गंभीर असल्यामुळे त्यांनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक बंदीची अप्रत्यक्ष घोषणा केली होती. त्यामुळे उत्पादक, कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्पादनात अथवा तयार मालाच्या पॅकेजिंगसाठी एकल प्लास्टिकचा उपयोग करू नये.भरतीया म्हणाले, कॅट देशातील ४० हजारांपेक्षा जास्त ट्रेड असोसिएशन आणि फेडरेशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकऐवजी ज्यूट बॅगचा उपयोग करण्यावर जागरूक करण्यात येणार आहे. कॅटने २९ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशनच्या एका राष्ट्रीय संमेलनात या मुद्यावर चर्चा आणि भविष्यातील धोरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.एआयपीसीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे आवाहन पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एफएमसीजी आणि कन्झुमर ड्युरेबल कंपन्यांवर आहे. कारण सामान्यांतर्फे या उत्पादनांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यात येतो. कंपन्यांनी एकल प्लास्टिकसाठी पर्यायी योजना तयार करावी. वितरकांनी अखिल भारतीय स्तरावर पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी