शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

व्यापाऱ्यांना राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : लॉकडाऊनपासूनच नागपुरात व्यापाऱ्यांवर लावलेल्या वेळेच्या निर्बंधात शिथिलता मिळावी, म्हणून विविध व्यापारी संघटनांच्या तीव्र आंदोलनाला आता ...

उदय अंधारे

नागपूर : लॉकडाऊनपासूनच नागपुरात व्यापाऱ्यांवर लावलेल्या वेळेच्या निर्बंधात शिथिलता मिळावी, म्हणून विविध व्यापारी संघटनांच्या तीव्र आंदोलनाला आता राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेचा पाठिंबा मिळत आहे. दोन वा तीन दिवसांत व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.

या विषयावर व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या अनेक प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री, सुनील केदार, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा समावेश आहे.

वेळेचे निर्बंध शिथिल करण्यासाठी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले आहे. व्यापार बचाओ संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.नितीन राऊत आणि सुनील केदार यांची भेट घेऊन गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीत विषय लावून धरण्याची विनंती केली होती. मिकी अरोरा यांनीही फोनवर विजय वडेट्टीवार यांच्याशी या प्रश्नावर बातचित केली असता, त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत व्यापाऱ्यांच्या बाजूने समर्थन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही दर शुक्रवारी होणाऱ्या शहराच्या परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत व्यापाऱ्यांवरील निर्बंध शिथिल करता येणार नाहीत, असेही सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विमला आर. यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात नागपूरच्या कोविडच्या सुधारित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरला लेव्हल-१ श्रेणीत समाविष्ट करण्याचा उल्लेख केला आहे.

टास्क फोर्सचा निर्णय अंतिम

बुधवारी महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनीही नागपुरातील अंकुश हटविण्याची शिफारस मंत्रिमंडळात केल्याचे म्हटले जाते, पण यावर सरकारच्या टास्क फोर्सचा निर्णय अंतिम ठरणार आहे.

दरम्यान, व्यापार बचाओ संघर्ष समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल आणि सहसंयोजक तेजिंदरसिंग रेणू यांनी सरकार व्यापाऱ्यांच्या संदर्भात अनुकूल निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.