शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

रस्ते, गडरलाईनसाठी नगरवासीयांचा संघर्ष ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST

नागपूर : नागपूर शहराचा कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु संघर्षनगरातील नागरिकांच्या नशिबी मूलभूत ...

नागपूर : नागपूर शहराचा कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत आहेत. परंतु संघर्षनगरातील नागरिकांच्या नशिबी मूलभूत सुविधाही नाहीत. त्यांना खराब रस्त्यावरूनच चालावे लागते. गडरलाईन नेहमीच चोक होत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्या संघर्षनगरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडल्या.

रस्त्यांची अवस्था बिकट

वाठोडा चौक ते भांडेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना तर सोडाच, या रस्त्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर उडत असलेल्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही खराब झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

गडरलाईनमुळे पसरते दुर्गंधी

संघर्षनगरात गडरलाईन आहे. परंतु या गडरलाईनचे चेंबर जागोजागी तुटलेले आहेत. त्यामुळे वस्तीत नेहमीच दुर्गंधीचे वातावरण राहते. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने या भागातील गडरलाईनची नियमित देखभाल करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

या भागात इलेक्ट्रिक खांबावरील लाईट सकाळी ५ वाजता बंद होतात. त्यामुळे सकाळीच फिरायला जाणाऱ्या महिला, नागरिकांना अंधारातच फिरावे लागते. त्यामुळे हे स्ट्रीटलाईट उशिरा बंद करावेत, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

नियमित होत नाही सफाई

सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे या भागात नेहमीच कचरा साचलेला आढळतो. कचरा उचलणारी गाडी आठवड्यातून एक वेळा नागरिक झोपेत असताना सकाळी ६ वाजताच येते. त्यामुळे नाईलाजास्तव या भागातील नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिकेने या भागात नियमित कचरा संकलन करण्याची गरज आहे. तसेच या भागात असलेले मंदिर महापालिकेने अतिक्रमण हटावच्या कारवाईत तोडले. तेथे नगरसेवकांनी लावलेल्या बेंचवर असामाजिक तत्त्वे बसतात. त्यामुळे वस्तीतील महिला, नागरिकांना त्रास होतो. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

विजेची वायर जीवघेणी

संघर्षनगरात प्रत्येक गल्लीत विजेचे खांब नाहीत. त्यामुळे ज्या गल्लीत खांब आहेत त्या गल्लीतून इतर नागरिकांना विजेचे कनेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या घरावरून विजेच्या तारा लोंबकळत आहेत. या विजेच्या तारा तुटल्यास नागरिकांना विजेचा धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महावितरणने प्रत्येक वस्तीत विजेचे खांब लावून नागरिकांना संभाव्य धोक्यापासून वाचविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे डांबरीकरण व्हावे

‘रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची गरज आहे.’

- आकाश घिवदोंडे, नागरिक

गडरलाईनची देखभाल करावी

‘गडरलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागातील गडरलाईनची नियमित देखभाल करण्याची व्यवस्था करावी.’

- प्रकाश जुमडे, नागरिक

नियमित सफाई महत्त्वाची

‘परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे कचरा साचून राहतो. कचरा उचलणारी गाडीही भल्या पहाटे येत असल्यामुळे उपयोग होत नाही. त्यामुळे परिसरात नियमित सफाई करण्याची गरज आहे.’

- श्याम सिल्वेस, नागरिक

स्ट्रीटलाईट लवकर बंद करू नयेत

‘संघर्षनगर परिसरातील स्ट्रीटलाईट सकाळी ५ वाजताच बंद होतात. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या महिला, नागरिकांना अंधारातच फिरावे लागते. महापालिकेने या भागातील स्ट्रीटलाईट उशिरा बंद करण्याची गरज आहे.’

- सरिता गुप्ता, महिला

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

‘परिसरात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे महिलांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.’

- बेबी वानखेडे, महिला

विजेचे खांब लावावेत

‘संघर्षनगरात प्रत्येक गल्लीत विजेचे खांब नाहीत. नागरिकांच्या घरावर विजेच्या तारा लोंबकळत असतात. त्यामुळे धोका होण्याची शक्यता असून प्रत्येक गल्लीत विजेचे खांब लावण्याची व्यवस्था करावी.’

- बबली ब्रम्हे, महिला

.................