शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

एकूण पदके २३७, तंदुरुस्त शरीर आणि अवघे पाऊणशे वयोमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 10:37 IST

 नागपुरातील प्रभाकर साठे वय वर्षे ७५. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे.

ठळक मुद्देपोहण्याने दिले शरीराला बळ एकदाही पाहिले नाही दवाखान्याचे तोंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील  प्रभाकर साठे वय वर्षे ७५ यांना बघितल्यावर वाटणार नाही, या वयातही ही व्यक्ती एवढी फिट कशी. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. कधी तास, कधी दोन तास अगदी लहान मुलांसारखे पाण्यात खेळतात. त्यांच्या फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे. त्यामुळे पाऊणशे वयोमानातही मी दवाखान्याचे तोंड बघितले नाही.निव्वळ आनंद म्हणूनच नाही, तर साठे यांनी वयाची पंचाहत्तरी गाठताना अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी विश्व मास्टर्स जलतरण सूर स्पर्धा स्वीडन २०१०, रिमिनी - इटली २०१२, मॉन्ट्रियल- कॅनडा २०१४, कझान -रशिया २०१५, येथे सूर स्पर्धेत ५ पदके प्राप्त केली आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० सुवर्ण, ५५ रौप्य व ३२ कांस्य अशी एकूण २३७ पदके प्राप्त केली आहेत.प्रभाकर साठे हे शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातून विभागीय ग्रंथपाल म्हणून २००३ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी ३५ वर्षे येथे सेवा दिली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी अंबाझरीच्या नाल्यात गुराख्यांच्या मुलांसोबत पोहणे शिकले. १९६५-६६ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट जलतरण व सूरपटूचा सन्मान प्राप्त केला. त्यांनी जिल्हा ते राष्ट्रीय जलतरण सूर स्पर्धा गाजविल्या.त्यांचे विशेष कौतुक म्हणून या वयातही त्यांनी दोन मुलांना अंबाझरी तलावात बुडता बुडता वाचविले. ३१ मे २०१६ रोजी अंबाझरी तलावात दोन मुले पाण्यात गटांगळ्या खात होती. प्रभाकर साठे यांना दिसताच, त्यांनी तत्काळ तलावात उडी घेतली आणि दोघांचेही प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले.शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोहण्यास कधी खंड पडू दिला नाही. यातच ते आपल्या जीवनाचा आनंद मानतात.

मी निरोगी असल्याचा अभिमान आहेनिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने आपले शरीर सांभाळणे महत्त्वाचे आहे. पोहण्यामुळे शरीर, मन, शांत व स्थिर राहून शरीराला लवचिकता प्राप्त होते. पोहण्यासारखा आनंद नाही, मग कितीही टेन्शन असेल तरी, तुम्ही जग विसरता, आनंद मिळतो. या वयातही मी निरोगी असल्याबद्दल मला अभिमान आहे.- प्रभाकर साठे,मास्टर्स जलतरणपटू

टॅग्स :Sportsक्रीडा