शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य

By admin | Updated: December 24, 2014 00:46 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री : ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियाननागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील चिटणीस सेंटरमध्ये ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागपूर विभागासाठी आयोजित विभागीय कार्यशाळेचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मध्य प्रदेशच्या धर्तीवर जलसंवर्धनाची कामे राज्यात करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी आणि जलसंवर्धनाशी संबंधित सर्व योजना एकत्र करून पाण्याच्या नियोजनाला चळवळीचे रूप दिले जात आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व अधिकार संबंधित समितीला देण्यात आले आहे, चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर समाधानकारक काम न झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.पाण्याचे आॅडिट होणारपुढच्या काळात पाण्याचे आॅडिट करण्यात येणार आहे. या अंतर्गत गावात पाण्याचा वापर, सिंचनासाठी लागणारे पाणी, सध्याचा वापर, भविष्यात पिण्यासाठी लागणारे पाणी आणि कमी पडत असेल तर त्याची गरज तपासली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त अनुप कुमार, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, नागपूर विभागातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)