शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

टमाटर, वांगे, पत्ताकोबी स्वस्त

By admin | Updated: June 10, 2014 01:12 IST

यंदा उन्हाळ्यात स्थानिक उत्पादकांची आवक वाढल्याने बहुतांश भाज्या स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या आहेत. टमाटर, वांगे, पत्ता कोबी, कोहळे, तोंडले या भाज्यांमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट

गृहिणींचे बजेट आटोक्यात : आवक वाढलीनागपूर : यंदा उन्हाळ्यात स्थानिक उत्पादकांची आवक वाढल्याने बहुतांश भाज्या स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या आहेत. टमाटर, वांगे, पत्ता  कोबी, कोहळे, तोंडले या भाज्यांमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहेत. सध्या कांदे आणि बटाट्याची आवक कमी झाली असून दर  वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आवक वाढलीसध्या कॉटन मार्केट बाजारात लहानमोठय़ा २00 गाड्यांची आवक आहे. काही भाज्या नागपूरपासून २५0 ते ३00 कि.मी. अंतरावरून तर काही  लगतच्या राज्यातून येत आहेत. त्याच कारणाने भेंडी, कारले, सिमली मिरची महाग आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत दर स्थिर राहतील, अशी माहिती  महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. स्थानिक उत्पादकांकडून सर्वाधिक आवक आहे.  कॉटन मार्केटमध्ये नाशिकहून टमाटर मोठय़ा प्रमाणात येत असल्याने प्रति किलो भाव ६ रुपये आहे. मटर जबलपूर, गाजर दिल्ली आणि सिमला मिरची दिग्रस, नाशिक टमाटर, रायपूर येथून तोंडले, ओरिसातून फणस आणि जगदलपूर येथून हिरवी  मिरचीची आवक आहे. नाशिक येथून येणारे टमाटर वाहतुकीला परवडत नाही, पण आवक जास्त असल्याने दरही कमी आहेत. किरकोळमध्ये बटाटे महागआवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात बटाटे महाग आहेत. २५ रुपये किलो दराने विक्री सुरू                   आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा,  कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे. दररोज १२ ते १३ ट्रकची आवक आहे. रविवारी चांगल्या प्रतीच्या बटाट्याचे भाव १६ ते १८ रुपये किलो  होते. किरकोळमध्ये २५ रुपये दर आहेत. (प्रतिनिधी)कळमन्यात कांदे १८ रुपयांवर!कळमना बाजारात कांदे प्रति किलो १६ ते १८ रुपयात विक्री सुरू आहे. पुढील काही दिवसात कांदे महागतील, अशी शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली  आहे. दररोज २0 ट्रक असलेली आवक सध्या १२ ते १५ पर्यंंत कमी झाली. शेतकरी आणि व्यापार्‍यांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक केली आहे.  शेतकरी त्याला हव्या असलेल्या भावात विक्री करीत आहेत. त्यामुळे आवक घटली आहे. परिणामी भाववाढ झाल्याचे कळमन्यातील आलू-कांदा  असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले. बुलडाणा येथून लाल कांदा तर अमरावती व अकोला येथून पांढरा कांदा येत आहे.  अहमदनगर येथून एक किंवा दोन ट्रक आवक आहे. रविवारी लाल कांदा ५00 ते ६00 रुपये (४0 किलो) आणि पांढरा कांदा ६५0 ते ७५0 रुपये  भाव होते.