शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

तोगडियांचा विखार अन् सरसंघचालकांचे ‘डॅमेज कंट्रोल’

By admin | Updated: December 26, 2016 02:27 IST

नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा

मंचावर मतभेद : जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, तोगडियांचे वक्तव्य व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग शफी पठाण नागपूर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा मोदींच्या कार्याचा सातत्याने पुरस्कार करीत आहेत. परंतु संघालाच आपली मातृसंस्था मानणारी विश्व हिंदू परिषद मात्र या ‘कौतुक यात्रेत’ कधीच सहभागी झाली नाही. विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया तर संधी मिळेल तेव्हा मोदींवर हल्ला चढवित असतात. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोपाला तोगडियांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. सरसंघचालकांच्या उपस्थितीत व देशभरातील संतांच्या मांदियाळीत तोगडिया काही उलटसुलट बोलणार नाहीत, अशी आयोजकांची अपेक्षा असावी. परंतु ही अपेक्षा साफ खोटी ठरवत तोगडियांनी केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विषयांसह मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवरही चौफेर शाब्दिक हल्ला चढविला अन् या अनपेक्षित हल्ल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो हे लक्षात येताच दस्तुरखुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाच ‘डॅमेज कंट्रोल’साठी मोर्चा सांभाळावा लागला. या कार्यक्रमात प्रवीण तोगडिया काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तोगडियांनी सुरुवातच राममंदिर अजून का बांधले गेले नाही, या प्रश्नापासून केली अन् पुढे गोहत्याबंदीचे काय झाले, लोकसंख्या कायदा का येत नाही, असे एकामागून एक अनेक प्रश्न क्षेपणास्त्र डागले. भारताला पूर्णत: हिंदू राष्ट्र बनविण्याचे जोरदार समर्थन करीत त्यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येबाबत अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारला जबाबदार धरले. तोगडिया इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अमेरिकेत ट्रम्प का राष्ट्रपती होऊ शकले याचे ‘मार्मिक विश्लेषण’ करताना मोदींच्या कार्यशैलीवरही सांकेतिक प्रहार केला. महाकुंभाच्या मंचावरून सलग तीन दिवस ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयत्न सुरू असताना त्यांनी एका फटक्यात महाकुंभाचा नूरच बदलून टाकला. यामुळे देशात चुकीचा संदेश जाईल, असे लक्षात येताच सरसंघचालकांनी आपल्या भाषणात तोगडियांचे नाव घेत त्यांच्या वक्तव्यावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न केला. नुसत्या प्रखर भाषणांनी भागणार नाही, अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर शक्ती पाठीशी असली पाहिजे. ती पाठीशी नसली की कुणी ऐकत नाही. ही शक्ती समाजातील सर्व स्तरांना सोबत घेतल्याशिवाय मिळू शकणार नाही, असे अधिकारवाणीचे दोन खडे बोल सुनावले. जितेंद्रनाथ महाराजांनीही तोगडियांचे वक्तव्य व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असल्याचे सांगितले. परंतु तोपर्यंत तोगडियांच्या शब्दांनी आपला अपेक्षित परिणाम साधला होता.