शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

तोगडियांचा विखार अन् सरसंघचालकांचे ‘डॅमेज कंट्रोल’

By admin | Updated: December 26, 2016 02:27 IST

नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा

मंचावर मतभेद : जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, तोगडियांचे वक्तव्य व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग शफी पठाण नागपूर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा मोदींच्या कार्याचा सातत्याने पुरस्कार करीत आहेत. परंतु संघालाच आपली मातृसंस्था मानणारी विश्व हिंदू परिषद मात्र या ‘कौतुक यात्रेत’ कधीच सहभागी झाली नाही. विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया तर संधी मिळेल तेव्हा मोदींवर हल्ला चढवित असतात. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोपाला तोगडियांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. सरसंघचालकांच्या उपस्थितीत व देशभरातील संतांच्या मांदियाळीत तोगडिया काही उलटसुलट बोलणार नाहीत, अशी आयोजकांची अपेक्षा असावी. परंतु ही अपेक्षा साफ खोटी ठरवत तोगडियांनी केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विषयांसह मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवरही चौफेर शाब्दिक हल्ला चढविला अन् या अनपेक्षित हल्ल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो हे लक्षात येताच दस्तुरखुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाच ‘डॅमेज कंट्रोल’साठी मोर्चा सांभाळावा लागला. या कार्यक्रमात प्रवीण तोगडिया काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तोगडियांनी सुरुवातच राममंदिर अजून का बांधले गेले नाही, या प्रश्नापासून केली अन् पुढे गोहत्याबंदीचे काय झाले, लोकसंख्या कायदा का येत नाही, असे एकामागून एक अनेक प्रश्न क्षेपणास्त्र डागले. भारताला पूर्णत: हिंदू राष्ट्र बनविण्याचे जोरदार समर्थन करीत त्यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येबाबत अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारला जबाबदार धरले. तोगडिया इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अमेरिकेत ट्रम्प का राष्ट्रपती होऊ शकले याचे ‘मार्मिक विश्लेषण’ करताना मोदींच्या कार्यशैलीवरही सांकेतिक प्रहार केला. महाकुंभाच्या मंचावरून सलग तीन दिवस ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयत्न सुरू असताना त्यांनी एका फटक्यात महाकुंभाचा नूरच बदलून टाकला. यामुळे देशात चुकीचा संदेश जाईल, असे लक्षात येताच सरसंघचालकांनी आपल्या भाषणात तोगडियांचे नाव घेत त्यांच्या वक्तव्यावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न केला. नुसत्या प्रखर भाषणांनी भागणार नाही, अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर शक्ती पाठीशी असली पाहिजे. ती पाठीशी नसली की कुणी ऐकत नाही. ही शक्ती समाजातील सर्व स्तरांना सोबत घेतल्याशिवाय मिळू शकणार नाही, असे अधिकारवाणीचे दोन खडे बोल सुनावले. जितेंद्रनाथ महाराजांनीही तोगडियांचे वक्तव्य व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असल्याचे सांगितले. परंतु तोपर्यंत तोगडियांच्या शब्दांनी आपला अपेक्षित परिणाम साधला होता.