शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:54 IST

जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे.

ठळक मुद्देहजारांवर मतदान यंत्रे : सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे. मतदान होत असलेली सर्वाधिक ३६ गावे सावनेर तालुक्यात असून, सर्वांत कमी चार गावे कुही तालुक्यातील आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली असून, ‘पोलिंग पार्टी’ संबंधित गावांमध्ये पोहचली आहे. शिवाय, त्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.निवडणुका होत असलेल्या एकूण २३८ ग्रामपंचायतींमध्ये नरखेड तालुक्यातील २२, काटोल २७, कळमेश्वर २४, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७, भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोमवारी मतदान होणार असल्याने प्रचार तोफा थंडावल्या आहेत. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान अधिकाºयांसह कर्मचाºयांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले.त्यांना संबंधित तहसील कार्यालयातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांना संबंधित गावांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यासाठी एकूण २००७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची व राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एक तुकडी तैनात केली आहे. हा पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग यांच्या नेतृत्वात सात पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी), २१ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,२११ पोलीस कर्मचारी, ६५० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी नाकाबंदीकरीता पोलीस केंद्र तयार करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग व पेट्रोलिंग पथक नियुक्त केले आहे. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील विशेष पथक गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व त्यानंतर येणाºया विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस यासह अन्य राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर बारीक नजर ठेवून आहे.कामठी तालुक्यात ११७ मतदान केंद्रकामठी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार असून, २७ सरपंचपदांसाठी एकूण ९६ उमेदवार आणि २४७ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी एकूण ६२१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ११७ मतदानकेंद्राची निर्मिती केली आहे. तालुक्यात ६१,२५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात ३१,८०१ पुरुष व २९,४५३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील रनाळा, भिलगाव, आजनी, तरोडी येथील २२ मतदानकेंद्र संवेदनशील घोषित केले आहेत.एक मतदार, चार मतदानग्रामपंचायतच्या प्रभागामध्ये (वॉर्ड) कमीतकमी दोन आणि अधिकाधिक तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. सोबतच सरपंचपदाच्या उमेदवारालाही यावेळी निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन सदस्यांसोबत चौथे मत सरपंचपदाच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एकाचवेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढू शकते. ती व्यक्ती सुदैवाने दोन्ही जागांवर विजयी झाल्यास तिला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणारअसल्याने पोटनिवडणुकीची वेळ येऊ शकते.नागलवाडीत सरपंच अविरोधहिंगणा : तालुक्यात रायपूर, कवडस, नागलवाडी, वागधरा, खैरी (पन्नासे), उमरी (वाघ) आणि चिचोली (पठार) या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी नागलवाडी येथील सरपंच आणि सहा ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. उर्वरित सहा सरपंचपदांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या ६३ जागांसाठी एकूण १५९ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये २७ मतदानकेंद्रांची निर्मिती केली असून, ७,८६७ पुरुष व ७,२३७ महिला असे एकूण १५,१०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.सावनेरात सरपंचपदाचे १२५ उमेदवारसावनेर : तालुक्यातील सरपंचपदाच्या ३६ जागांसाठी एकूण १२५ आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत ४३,७८३ पुरुष आणि ३९,६६५ महिला असे एकूण ८३,४४८ मतदार मतदान करतील. मतदानासाठी १४९ मतदान केंद्र तयार केले असून, ८२५ कर्मचारी व ३०० पोलीस नियुक्त केले आहेत.