शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:54 IST

जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे.

ठळक मुद्देहजारांवर मतदान यंत्रे : सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे. मतदान होत असलेली सर्वाधिक ३६ गावे सावनेर तालुक्यात असून, सर्वांत कमी चार गावे कुही तालुक्यातील आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली असून, ‘पोलिंग पार्टी’ संबंधित गावांमध्ये पोहचली आहे. शिवाय, त्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.निवडणुका होत असलेल्या एकूण २३८ ग्रामपंचायतींमध्ये नरखेड तालुक्यातील २२, काटोल २७, कळमेश्वर २४, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७, भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोमवारी मतदान होणार असल्याने प्रचार तोफा थंडावल्या आहेत. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान अधिकाºयांसह कर्मचाºयांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले.त्यांना संबंधित तहसील कार्यालयातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांना संबंधित गावांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यासाठी एकूण २००७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची व राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एक तुकडी तैनात केली आहे. हा पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग यांच्या नेतृत्वात सात पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी), २१ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,२११ पोलीस कर्मचारी, ६५० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी नाकाबंदीकरीता पोलीस केंद्र तयार करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग व पेट्रोलिंग पथक नियुक्त केले आहे. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील विशेष पथक गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व त्यानंतर येणाºया विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस यासह अन्य राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर बारीक नजर ठेवून आहे.कामठी तालुक्यात ११७ मतदान केंद्रकामठी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार असून, २७ सरपंचपदांसाठी एकूण ९६ उमेदवार आणि २४७ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी एकूण ६२१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ११७ मतदानकेंद्राची निर्मिती केली आहे. तालुक्यात ६१,२५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात ३१,८०१ पुरुष व २९,४५३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील रनाळा, भिलगाव, आजनी, तरोडी येथील २२ मतदानकेंद्र संवेदनशील घोषित केले आहेत.एक मतदार, चार मतदानग्रामपंचायतच्या प्रभागामध्ये (वॉर्ड) कमीतकमी दोन आणि अधिकाधिक तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. सोबतच सरपंचपदाच्या उमेदवारालाही यावेळी निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन सदस्यांसोबत चौथे मत सरपंचपदाच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एकाचवेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढू शकते. ती व्यक्ती सुदैवाने दोन्ही जागांवर विजयी झाल्यास तिला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणारअसल्याने पोटनिवडणुकीची वेळ येऊ शकते.नागलवाडीत सरपंच अविरोधहिंगणा : तालुक्यात रायपूर, कवडस, नागलवाडी, वागधरा, खैरी (पन्नासे), उमरी (वाघ) आणि चिचोली (पठार) या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी नागलवाडी येथील सरपंच आणि सहा ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. उर्वरित सहा सरपंचपदांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या ६३ जागांसाठी एकूण १५९ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये २७ मतदानकेंद्रांची निर्मिती केली असून, ७,८६७ पुरुष व ७,२३७ महिला असे एकूण १५,१०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.सावनेरात सरपंचपदाचे १२५ उमेदवारसावनेर : तालुक्यातील सरपंचपदाच्या ३६ जागांसाठी एकूण १२५ आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत ४३,७८३ पुरुष आणि ३९,६६५ महिला असे एकूण ८३,४४८ मतदार मतदान करतील. मतदानासाठी १४९ मतदान केंद्र तयार केले असून, ८२५ कर्मचारी व ३०० पोलीस नियुक्त केले आहेत.