शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

आज देशात शेतकरी, शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी ...

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही, अशी खंत कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक फाऊंडेशन आणि वनराई फाऊंडेशनच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतकरी पुरस्कार-२०२१ धीरज जुनघरे यांना प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. एम. एस. लदानिया, आमदार निलय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

समारंभादरम्यान काटोल तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी धीरज जुनघरे यांना २१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती जुनघरे यांनी संक्षिप्त मनोगत व्यक्त करताना या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

डॉ. मायी म्हणाले, मोसंबी आणि संत्र्याच्या उत्पादनात नव्या तंत्राचा वापर करून शेतामध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांसाठी जुनघरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी नवे कृषी तंत्र आणले. तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा विकसित केली. आज देशाचे कृषी उत्पादन २३० मिलियन टनावर पोहचले आहे. उत्पादन वाढले पण मूल्य वाढले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

आमदार निलय नाईक प्रास्ताविकात म्हणाले, शेती, माती आणि पाण्यावर नाईक साहेबांचे नितांत प्रेम होते. आधुनिकीकरणावरही त्यांचा भर होता. मुंबईच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी त्यांनी केल्याने मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. लदानिया यांनी धीरज जुनघरे यांनी शेतात शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कलमांच्या लागवडीची आणि वापरलेल्या तंत्राची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही समारंभाच्या पूर्वार्धात हजेरी लावून मनोगतातून आदरांजली वाहिली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून वसंतराव नाईकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्यात असलेला सभ्यपणा आज राजकारणात दिसत नाही. राजकारणातील काळ सभ्यतेसाठी तिष्ठत आहे, अशी भावना व्यक्त केली. संचालन डॉ. पिनाक दंदे यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले. विविध क्षेत्रांतील मान्यवर समारंभाला हजर होते.