शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आज देशात शेतकरी, शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी ...

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही, अशी खंत कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक फाऊंडेशन आणि वनराई फाऊंडेशनच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतकरी पुरस्कार-२०२१ धीरज जुनघरे यांना प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. एम. एस. लदानिया, आमदार निलय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

समारंभादरम्यान काटोल तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी धीरज जुनघरे यांना २१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती जुनघरे यांनी संक्षिप्त मनोगत व्यक्त करताना या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

डॉ. मायी म्हणाले, मोसंबी आणि संत्र्याच्या उत्पादनात नव्या तंत्राचा वापर करून शेतामध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांसाठी जुनघरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी नवे कृषी तंत्र आणले. तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा विकसित केली. आज देशाचे कृषी उत्पादन २३० मिलियन टनावर पोहचले आहे. उत्पादन वाढले पण मूल्य वाढले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

आमदार निलय नाईक प्रास्ताविकात म्हणाले, शेती, माती आणि पाण्यावर नाईक साहेबांचे नितांत प्रेम होते. आधुनिकीकरणावरही त्यांचा भर होता. मुंबईच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी त्यांनी केल्याने मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. लदानिया यांनी धीरज जुनघरे यांनी शेतात शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कलमांच्या लागवडीची आणि वापरलेल्या तंत्राची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही समारंभाच्या पूर्वार्धात हजेरी लावून मनोगतातून आदरांजली वाहिली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून वसंतराव नाईकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्यात असलेला सभ्यपणा आज राजकारणात दिसत नाही. राजकारणातील काळ सभ्यतेसाठी तिष्ठत आहे, अशी भावना व्यक्त केली. संचालन डॉ. पिनाक दंदे यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले. विविध क्षेत्रांतील मान्यवर समारंभाला हजर होते.