शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

आज सुरू आहे ते सत्ताकारण; राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज - नितीन गडकरी

By योगेश पांडे | Updated: August 25, 2023 20:41 IST

नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे.

नागपूर : सद्यस्थितीत जे काही सुरू आहे ते सत्ताकारणच आहे. नेत्यांनी खरे तर सेवाकारण, विकासकारण आणि समाजकारणावर भर दिला पाहिजे. आजच्या काळात राजकारणाची व्याख्या बदलण्याची खरोखरच गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात ते एकल महाविद्यालयासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे. असे राजकारण विकासाशी जोडलेले असते. विदर्भाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठीच कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थांना सर्व स्तरांतून सहकार्य झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात सुरू असलेल्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. या वर्गात १०१६ शिक्षक आणि १२४ पर्यवेक्षक अशी एकूण १ हजार १४० मंडळी सहभागी झाली आहे. २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, सदस्य धनंजय बापट, सुधीर दिवे, डॉ. सी.डी. मायी यांची उपस्थिती होती.

गरज पडली तर शासकीय शिक्षकांना सहकार्यअनेक गावांमध्ये जिल्हा परिषद किंवा इतर शासकीय शाळाच्या शिक्षकांना प्रशिक्षण किंवा सहकार्याची आवश्यकता असते. कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून अशा शिक्षकांना आवश्यकता भासली तर निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. एकलव्य एकल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्य असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी