शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

आज फिर आँख मे नमी सी है...!

By admin | Updated: September 5, 2014 01:13 IST

युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली.

युगच्या मृत्यूची हळहळ : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना नागपूर : युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. चांडक कुटुंबीयांच्यावतीने युगच्या निधनाबद्दल (उठावना) श्रद्धांजली सभेचे आयोजन लकडगंज परिसरातील टिम्बर भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी चांडक यांच्या नातेवाईकांसह संवेदनशील नागपूरकर नागरिकही मोठ्या संख्येने युगला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले. याप्रसंगी डॉ. मुकेश चांडक, युगची आई, रमनलाल चांडक आदी कुटुंबीयांचे उपस्थितांनी सांत्वन केले. युगच्या हसऱ्या, प्रसन्न छायाचित्राकडे पाहून अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करताना दु:ख व्यक्त केले. पण नातेवाईक आणि नागपूरकर नागरिकांनी स्वत:च्या भावनेला आवर घालत चांडक कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. साधारणत: अशा आयोजनात स्वाभाविकपणे नातेवाईकांचा सहभाग असतो. पण या घटनेने हळहळलेले नागपूरकर युगला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाले होते. अनेकांनी केले चांडक यांचे सांत्वनजी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. पण आता नाईलाज झाला आहे. युगच्या हत्येने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पण आज चांडक परिवाराच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी पुन्हा जगण्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे सांत्वन केले. अनेकांनी डॉ. मुकेश यांना आलिंगन देऊन त्यांच्या वेदनेत आपण सहभागी असल्याचा धीर त्यांना दिला. युगची आई अद्याप या धक्क्यातून सावरली नाही. त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू होते. महिलांनी त्यांना धीर देत हे दु:ख सोसण्याचे बळ त्यांना मिळावे, अशी प्रार्थना केली. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेतप्रत्येकाच्या कुटुंबात लहान मुले असतात. प्रत्येक बाब मुलांना समजावून सांगता येत नाही. ती निरागस असतात. स्वाभाविकपणे ओळखीच्या व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसतो. पण आता ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याबद्दल पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. याबाबत पालकांमध्ये चर्चा होती. ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, असे बंधन मुलांवर टाकणे गैर आहे. किती बाबींपासून मुलांचे जगणे हिरावून घ्यायचे, हा प्रश्न यावेळी चर्चेला होता. मुले सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.