शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

आज फिर आँख मे नमी सी है...!

By admin | Updated: September 5, 2014 01:13 IST

युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली.

युगच्या मृत्यूची हळहळ : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना नागपूर : युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. चांडक कुटुंबीयांच्यावतीने युगच्या निधनाबद्दल (उठावना) श्रद्धांजली सभेचे आयोजन लकडगंज परिसरातील टिम्बर भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी चांडक यांच्या नातेवाईकांसह संवेदनशील नागपूरकर नागरिकही मोठ्या संख्येने युगला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले. याप्रसंगी डॉ. मुकेश चांडक, युगची आई, रमनलाल चांडक आदी कुटुंबीयांचे उपस्थितांनी सांत्वन केले. युगच्या हसऱ्या, प्रसन्न छायाचित्राकडे पाहून अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करताना दु:ख व्यक्त केले. पण नातेवाईक आणि नागपूरकर नागरिकांनी स्वत:च्या भावनेला आवर घालत चांडक कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. साधारणत: अशा आयोजनात स्वाभाविकपणे नातेवाईकांचा सहभाग असतो. पण या घटनेने हळहळलेले नागपूरकर युगला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाले होते. अनेकांनी केले चांडक यांचे सांत्वनजी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. पण आता नाईलाज झाला आहे. युगच्या हत्येने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पण आज चांडक परिवाराच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी पुन्हा जगण्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे सांत्वन केले. अनेकांनी डॉ. मुकेश यांना आलिंगन देऊन त्यांच्या वेदनेत आपण सहभागी असल्याचा धीर त्यांना दिला. युगची आई अद्याप या धक्क्यातून सावरली नाही. त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू होते. महिलांनी त्यांना धीर देत हे दु:ख सोसण्याचे बळ त्यांना मिळावे, अशी प्रार्थना केली. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेतप्रत्येकाच्या कुटुंबात लहान मुले असतात. प्रत्येक बाब मुलांना समजावून सांगता येत नाही. ती निरागस असतात. स्वाभाविकपणे ओळखीच्या व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसतो. पण आता ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याबद्दल पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. याबाबत पालकांमध्ये चर्चा होती. ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, असे बंधन मुलांवर टाकणे गैर आहे. किती बाबींपासून मुलांचे जगणे हिरावून घ्यायचे, हा प्रश्न यावेळी चर्चेला होता. मुले सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.