शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डाळीचा तडका ६०

By admin | Updated: June 29, 2017 02:25 IST

गेल्यावर्षी १५० रुपये किलो आणि यावर्षीच्या हंगामात मार्चमध्ये ७५ रुपयांवर असलेल्या सर्वोत्तम तूर डाळीचे दर चांगल्या मान्सूनच्या वृत्ताने

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्यावर्षी १५० रुपये किलो आणि यावर्षीच्या हंगामात मार्चमध्ये ७५ रुपयांवर असलेल्या सर्वोत्तम तूर डाळीचे दर चांगल्या मान्सूनच्या वृत्ताने बुधवारी होलसेल बाजारात ५६ रुपयांपर्यंत उतरले आहेत. किरकोळ बाजारात ६० ते ६२ रुपये दर आहेत. दोन महिन्यांत दर वेगाने कमी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे दर गेल्या दोन वर्षांपासून आकाशाला भिडले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. डाळीचे भाव सामान्यांच्या आवाक्यात यावेत, यासाठी सरकारनेसुद्धा प्रयत्न केले होते. यंदा तुरीचे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्येच तूरडाळीचे दर वेगाने कमी झाले आहेत. मार्चमध्ये प्रारंभी कळमना बाजारात दर ७५ रुपये किलो आणि त्यानंतर सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतर दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी उठाव कमी असल्यामुळे दर पुन्हा ७५ रुपयांपर्यंत खाली आले. यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुरीची तीन ते चार हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाली. त्यामुळे डाळीचे भाव आणखी उतरले. दर कमी झाल्यानंतरही खरेदीदार नाहीत, अशी माहिती धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी दिली. सध्या तूरडाळ होलसेल बाजारात दर्जानुसार ५० ते ५५ रुपये आणि किरकोळ बाजारात ६० ते ६२ रुपये किलो दराने विकली जात आहे. चांगल्या मान्सूनचा परिणाम : दरवाढीवर नियंत्रण चणा डाळ ९५ रुपये किलो तूरडाळीप्रमाणेच मागील महिन्याच्या तुलनेत चणाडाळ, मूगडाळ, मसूरडाळ आणि उडद मोगरच्या दरामध्ये वेगाने घसरण झाली आहे. गेल्यावर्षी १२० ते १३० रुपये किलोवर पोहोचलेली चणा डाळ यावर्षी होलसेल बाजारात ८० ते ८५ रुपये दर आहेत. किरकोळ बाजारात ९० ते ९५ रुपये दर आहेत. याशिवाय अन्य डाळींचेही दर स्थिर आहेत. मसूर डाळ ५२ ते ५६ रुपये किलो, मूग डाळ ५० ते ६५ आणि गेल्यावर्षी १६० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या उडद मोगरचे दर आता ८२ ते ९२ रुपयांवर स्थिर आहेत. गेल्यावर्षी उडद मोगरच्या दरामुळे लग्नाच्या मेजवानीतून दहीवड्याने ‘एक्झिट’ घेतली होती. उमाटे यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत किरकोळ व्यापारी तूरडाळ आणि चणाडाळीचा साठा करीत नाहीत. ते हवा तेवढाचा माल विक्रीसाठी बोलवितात. त्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि अन्य मालाची खरेदी करणे शक्य होते, असा व्यापाऱ्यांचा उद्देश आहे. एवढेच नव्हे तर वार्षिक धान्याचा साठा करण्याची ग्राहकांची पद्धतसुद्धा बदलली आहे. सर्व धान्य ३० किलोच्या पॅकिंगमध्ये येत असल्यामुळे तेसुद्धा आवश्यक तेवढेच धान्य खरेदी करतात. त्याचाही फटका बाजारपेठेला बसला आहे.