शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

वाघाचे रखवालदार वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 20, 2017 02:08 IST

रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

एसीटीपीएफचे पगार अडले : उपाशीपोटी कशी करणार सुरक्षा ?जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर, मानसिंगदेव व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तैनात असलेल्या शेकडो जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून नागपूरसह संपूर्ण राज्यात या दलाची (एनटीसीए) विशेष भरती करण्यात आली आहे. यात नागपूर वन विभागात सुमारे १०५ जवानांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या दलात तरुणांसह अनेक तरुणींचाही समावेश आहे. ही सर्व फौज रात्रंदिवस रानावनात आपले कर्तव्य बजावत आहे, असे असताना जंगलात त्यांच्यासाठी सोई-सुविधांचा नेहमीच अभाव राहिला आहे. परंतु तरी या जवानांनी त्याविषयी कधीही ओरड न करता, वाघाच्या सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे. त्यांची ही कर्तव्यदक्षता आणि जंगलातील नियमित गस्तीमुळे विदर्भातील वाघ सुरक्षित झाला आहे. शिवाय त्यामुळेच मागील काही वर्षांत विदर्भाच्या जंगलातील वाघांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी या जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश तरुण गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे अनेकजण प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम गावातील वृद्घ आई-वडिलांना पाठवित असतात. तर काहीजणांना मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटूंबाचे पालनपोषण करावे लागते. यापैकी एका जवानाच्या मते, मागील तीन महिन्यांपासून उसनवारी करून खर्च भागविला जात आहे. त्यामुळे अगोदरच डोक्यावर कर्ज झाल्याने आता कुणासमोर हात पसरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारासंबंधी पेंच कार्यालयात चौकशी केली असता, पुन्हा दिवाळीपर्यंत पगार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत आम्ही जगावे कसे असा प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या सर्व जवानांना पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव, टिपेश्वर व उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात तैनात केले आहे. शिवाय वन विभागाने या सर्व जवानांची जंगलात भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च आपल्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. परंतु आता त्यांच्या हाती पगारच मिळत नसल्याने पोट कसे भरावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. शिवाय हा जवान उपाशीपोटी वाघाची सुरक्षा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकारी म्हणतात, पाठपुरावा सुरू ‘‘एसटीपीएफ जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले आहेत, हे खरे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. या जवानांच्या पगारासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून तो निधी मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या जवानांचे पगार होऊ शकले नाही. परंतु त्यासाठी वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होताच पगार दिले जाईल. ’’-माणिकराव कातकडे सहायक वनसंरक्षक, एसटीपीएफ