शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे रखवालदार वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 20, 2017 02:08 IST

रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

एसीटीपीएफचे पगार अडले : उपाशीपोटी कशी करणार सुरक्षा ?जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर, मानसिंगदेव व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तैनात असलेल्या शेकडो जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून नागपूरसह संपूर्ण राज्यात या दलाची (एनटीसीए) विशेष भरती करण्यात आली आहे. यात नागपूर वन विभागात सुमारे १०५ जवानांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या दलात तरुणांसह अनेक तरुणींचाही समावेश आहे. ही सर्व फौज रात्रंदिवस रानावनात आपले कर्तव्य बजावत आहे, असे असताना जंगलात त्यांच्यासाठी सोई-सुविधांचा नेहमीच अभाव राहिला आहे. परंतु तरी या जवानांनी त्याविषयी कधीही ओरड न करता, वाघाच्या सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे. त्यांची ही कर्तव्यदक्षता आणि जंगलातील नियमित गस्तीमुळे विदर्भातील वाघ सुरक्षित झाला आहे. शिवाय त्यामुळेच मागील काही वर्षांत विदर्भाच्या जंगलातील वाघांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी या जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश तरुण गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे अनेकजण प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम गावातील वृद्घ आई-वडिलांना पाठवित असतात. तर काहीजणांना मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटूंबाचे पालनपोषण करावे लागते. यापैकी एका जवानाच्या मते, मागील तीन महिन्यांपासून उसनवारी करून खर्च भागविला जात आहे. त्यामुळे अगोदरच डोक्यावर कर्ज झाल्याने आता कुणासमोर हात पसरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारासंबंधी पेंच कार्यालयात चौकशी केली असता, पुन्हा दिवाळीपर्यंत पगार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत आम्ही जगावे कसे असा प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या सर्व जवानांना पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव, टिपेश्वर व उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात तैनात केले आहे. शिवाय वन विभागाने या सर्व जवानांची जंगलात भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च आपल्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. परंतु आता त्यांच्या हाती पगारच मिळत नसल्याने पोट कसे भरावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. शिवाय हा जवान उपाशीपोटी वाघाची सुरक्षा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकारी म्हणतात, पाठपुरावा सुरू ‘‘एसटीपीएफ जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले आहेत, हे खरे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. या जवानांच्या पगारासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून तो निधी मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या जवानांचे पगार होऊ शकले नाही. परंतु त्यासाठी वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होताच पगार दिले जाईल. ’’-माणिकराव कातकडे सहायक वनसंरक्षक, एसटीपीएफ