शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाघ विदर्भात, फॉरेन्सिक लॅब मात्र हैदराबादमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:58 IST

देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देनागपुरात लॅब गरजेचीअहवाल मिळतो उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. मध्य प्रदेशला तर टायगर हाऊसच म्हटले जाते. मात्र देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. परिणामत: तपासही लांबतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

जगभरात भारतामध्ये असलेली वाघांची सर्वाधिक संख्या असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. देशातील टॉपटेन वाघांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात असलेल्या ३१२ वाघांपैकी ३०० वाघ एकट्या विदर्भातील जंगलात आहेत. राज्यात असलेल्या सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भातच आहेत. यामुळे विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाची जबाबदारी आता वाढली आहे.

वन विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक वाघ मध्य भारतात आहेत. वाघांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा हैदराबादमधील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविला जातो. नागपूरनजीक १३ व्याघ्रप्रकल्प असून याठिकाणी नेहमी घटना घडत असतात. बरेचदा मानव वन्यजीव संघर्षातून घडणाऱ्या घटनांमध्ये वाघांचा जीव जातो. विजेच्या सापळ्यात तसेच शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडूनही वाघांचा मृत्यू होतो. अशा वेळी आरोपींकडून हस्तगत केलेली वाघाची हाडे, अवयव तपासण्यासाठी व त्याच्या तातडीने अहवालाची प्रतीक्षा असते. मात्र महिने लोटूनही हैदराबादवरून अहवाल मिळत नसल्याचा अनुभव आहे. अलिकडे वाघांची संख्याही विदर्भात वाढली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नागपुरात लॅब असण्याची गरज आहे.नागपुरातून २०१३-१४ मध्येच गेला प्रस्तावनागपुरात ही प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी करणारा प्रस्ताव आराखड्यासह आणि जागेच्या नकाशासह २०१३-१४ मध्येच गेला आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यात पुढाकार घेऊन तो वनविभागापुढे मांडला होता. पशुवैद्यक महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या बाजूला असलेली जागाही यासाठी सुचविली आहे. महाविद्यालयालादेखील अध्ययनासाठी याचा उपयोग होणार असल्याने महाविद्यालयाच्या मनुष्यबळाचा आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे. मंत्रालयापर्यंत हा प्रस्ताव पोहचूनही अद्यापतरी यावर विचार झालेला नाही.अनेक नमुने हैदराबादसह डेहराडूनलाही जातात. मात्र तिकडे कामाचा अधिक ताण असल्याने लवकर अहवाल येत नाही. परिणामत: गुन्हेगारांना संधी मिळते. पुरावेही नष्ट होतात. वन्यजीवांच्या मृत्यूनंतर अहवाल येण्यास अधिक काळ लोटल्यास गांभीर्य नष्ट होते. वाघ, बिबटांशिवाय अनेक प्राण्यांचे मूत्यू अहवालाविनाच इतिहासजमा होतात. त्यामुळे मध्य भारतात नागपुरात लॅब होणे सर्व दृष्टीने योग्य ठरेल.- विनित अरोरा, सेक्रेटरी, सृष्टी पर्यावरण मंडळ

 

टॅग्स :Tigerवाघ