शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

वाघ विदर्भात, फॉरेन्सिक लॅब मात्र हैदराबादमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:58 IST

देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देनागपुरात लॅब गरजेचीअहवाल मिळतो उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. मध्य प्रदेशला तर टायगर हाऊसच म्हटले जाते. मात्र देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. परिणामत: तपासही लांबतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

जगभरात भारतामध्ये असलेली वाघांची सर्वाधिक संख्या असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. देशातील टॉपटेन वाघांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात असलेल्या ३१२ वाघांपैकी ३०० वाघ एकट्या विदर्भातील जंगलात आहेत. राज्यात असलेल्या सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भातच आहेत. यामुळे विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाची जबाबदारी आता वाढली आहे.

वन विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक वाघ मध्य भारतात आहेत. वाघांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा हैदराबादमधील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविला जातो. नागपूरनजीक १३ व्याघ्रप्रकल्प असून याठिकाणी नेहमी घटना घडत असतात. बरेचदा मानव वन्यजीव संघर्षातून घडणाऱ्या घटनांमध्ये वाघांचा जीव जातो. विजेच्या सापळ्यात तसेच शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडूनही वाघांचा मृत्यू होतो. अशा वेळी आरोपींकडून हस्तगत केलेली वाघाची हाडे, अवयव तपासण्यासाठी व त्याच्या तातडीने अहवालाची प्रतीक्षा असते. मात्र महिने लोटूनही हैदराबादवरून अहवाल मिळत नसल्याचा अनुभव आहे. अलिकडे वाघांची संख्याही विदर्भात वाढली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नागपुरात लॅब असण्याची गरज आहे.नागपुरातून २०१३-१४ मध्येच गेला प्रस्तावनागपुरात ही प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी करणारा प्रस्ताव आराखड्यासह आणि जागेच्या नकाशासह २०१३-१४ मध्येच गेला आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यात पुढाकार घेऊन तो वनविभागापुढे मांडला होता. पशुवैद्यक महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या बाजूला असलेली जागाही यासाठी सुचविली आहे. महाविद्यालयालादेखील अध्ययनासाठी याचा उपयोग होणार असल्याने महाविद्यालयाच्या मनुष्यबळाचा आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे. मंत्रालयापर्यंत हा प्रस्ताव पोहचूनही अद्यापतरी यावर विचार झालेला नाही.अनेक नमुने हैदराबादसह डेहराडूनलाही जातात. मात्र तिकडे कामाचा अधिक ताण असल्याने लवकर अहवाल येत नाही. परिणामत: गुन्हेगारांना संधी मिळते. पुरावेही नष्ट होतात. वन्यजीवांच्या मृत्यूनंतर अहवाल येण्यास अधिक काळ लोटल्यास गांभीर्य नष्ट होते. वाघ, बिबटांशिवाय अनेक प्राण्यांचे मूत्यू अहवालाविनाच इतिहासजमा होतात. त्यामुळे मध्य भारतात नागपुरात लॅब होणे सर्व दृष्टीने योग्य ठरेल.- विनित अरोरा, सेक्रेटरी, सृष्टी पर्यावरण मंडळ

 

टॅग्स :Tigerवाघ