शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

वाघ विदर्भात, फॉरेन्सिक लॅब मात्र हैदराबादमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:58 IST

देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देनागपुरात लॅब गरजेचीअहवाल मिळतो उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. मध्य प्रदेशला तर टायगर हाऊसच म्हटले जाते. मात्र देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. परिणामत: तपासही लांबतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.

जगभरात भारतामध्ये असलेली वाघांची सर्वाधिक संख्या असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. देशातील टॉपटेन वाघांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात असलेल्या ३१२ वाघांपैकी ३०० वाघ एकट्या विदर्भातील जंगलात आहेत. राज्यात असलेल्या सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भातच आहेत. यामुळे विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाची जबाबदारी आता वाढली आहे.

वन विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक वाघ मध्य भारतात आहेत. वाघांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा हैदराबादमधील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविला जातो. नागपूरनजीक १३ व्याघ्रप्रकल्प असून याठिकाणी नेहमी घटना घडत असतात. बरेचदा मानव वन्यजीव संघर्षातून घडणाऱ्या घटनांमध्ये वाघांचा जीव जातो. विजेच्या सापळ्यात तसेच शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडूनही वाघांचा मृत्यू होतो. अशा वेळी आरोपींकडून हस्तगत केलेली वाघाची हाडे, अवयव तपासण्यासाठी व त्याच्या तातडीने अहवालाची प्रतीक्षा असते. मात्र महिने लोटूनही हैदराबादवरून अहवाल मिळत नसल्याचा अनुभव आहे. अलिकडे वाघांची संख्याही विदर्भात वाढली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नागपुरात लॅब असण्याची गरज आहे.नागपुरातून २०१३-१४ मध्येच गेला प्रस्तावनागपुरात ही प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी करणारा प्रस्ताव आराखड्यासह आणि जागेच्या नकाशासह २०१३-१४ मध्येच गेला आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यात पुढाकार घेऊन तो वनविभागापुढे मांडला होता. पशुवैद्यक महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या बाजूला असलेली जागाही यासाठी सुचविली आहे. महाविद्यालयालादेखील अध्ययनासाठी याचा उपयोग होणार असल्याने महाविद्यालयाच्या मनुष्यबळाचा आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे. मंत्रालयापर्यंत हा प्रस्ताव पोहचूनही अद्यापतरी यावर विचार झालेला नाही.अनेक नमुने हैदराबादसह डेहराडूनलाही जातात. मात्र तिकडे कामाचा अधिक ताण असल्याने लवकर अहवाल येत नाही. परिणामत: गुन्हेगारांना संधी मिळते. पुरावेही नष्ट होतात. वन्यजीवांच्या मृत्यूनंतर अहवाल येण्यास अधिक काळ लोटल्यास गांभीर्य नष्ट होते. वाघ, बिबटांशिवाय अनेक प्राण्यांचे मूत्यू अहवालाविनाच इतिहासजमा होतात. त्यामुळे मध्य भारतात नागपुरात लॅब होणे सर्व दृष्टीने योग्य ठरेल.- विनित अरोरा, सेक्रेटरी, सृष्टी पर्यावरण मंडळ

 

टॅग्स :Tigerवाघ