शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

वाघाचे रखवालदार उपाशी !

By admin | Updated: May 16, 2016 03:18 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्.

पेंच व्याघ्र प्रकल्प : ‘एसटीपीएफ’ चे पगार थांबलेनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्. मात्र या जवानांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जवानांना जंगलात २४ तास तैनात करण्यात आले आहे. असे असताना वन विभागाने त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च्या भोजनाची स्वत:च व्यवस्था करावी लागते. मात्र तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने पोट कसे भरावे,अशा चिंतेत सापडले आहे. शिवाय उपाशीपोटी ही फौज वाघाची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून वन विभागाने मागील चार वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात या एनटीपीएफ जवानांची विशेष भरती केली आहे. त्यानुसार सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण ७६ एसटीपीएफ जवान तैनात आहेत. त्यामध्ये ५४ तरुण आणि २२ तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जवानांचे पगार वेळेवर न होणे, ही नेहमीच समस्या बनली आहे. मागील वर्षी सुद्धा या जवानांच्या पगाराची अशीच समस्या निर्माण झाली होती. वनविभाग वेळोवेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आले आहे. या सर्व जवानांचे तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या एसटीपीएफ फौजेतील बहुतांश तरुण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वन विभागाने या सर्व जवानांच्या प्रवास भत्त्याचे बिले मागील चार वर्षांपासून रोखून ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय दुसरीकडे वन विभागातील इतर वनरक्षकांचे मात्र दोन महिन्यापूर्वीच प्रवासभत्ता बिले मिळाली आहे. तसेच ताडोबा येथील एसटीपीएफ जवानांना सुद्धा प्रवासभत्ता बिले देण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असताना आमच्यावरच अन्याय का, असा पेंचमधील सर्व जवानांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)