शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे रखवालदार उपाशी !

By admin | Updated: May 16, 2016 03:18 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्.

पेंच व्याघ्र प्रकल्प : ‘एसटीपीएफ’ चे पगार थांबलेनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्. मात्र या जवानांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जवानांना जंगलात २४ तास तैनात करण्यात आले आहे. असे असताना वन विभागाने त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च्या भोजनाची स्वत:च व्यवस्था करावी लागते. मात्र तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने पोट कसे भरावे,अशा चिंतेत सापडले आहे. शिवाय उपाशीपोटी ही फौज वाघाची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून वन विभागाने मागील चार वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात या एनटीपीएफ जवानांची विशेष भरती केली आहे. त्यानुसार सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण ७६ एसटीपीएफ जवान तैनात आहेत. त्यामध्ये ५४ तरुण आणि २२ तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जवानांचे पगार वेळेवर न होणे, ही नेहमीच समस्या बनली आहे. मागील वर्षी सुद्धा या जवानांच्या पगाराची अशीच समस्या निर्माण झाली होती. वनविभाग वेळोवेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आले आहे. या सर्व जवानांचे तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या एसटीपीएफ फौजेतील बहुतांश तरुण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वन विभागाने या सर्व जवानांच्या प्रवास भत्त्याचे बिले मागील चार वर्षांपासून रोखून ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय दुसरीकडे वन विभागातील इतर वनरक्षकांचे मात्र दोन महिन्यापूर्वीच प्रवासभत्ता बिले मिळाली आहे. तसेच ताडोबा येथील एसटीपीएफ जवानांना सुद्धा प्रवासभत्ता बिले देण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असताना आमच्यावरच अन्याय का, असा पेंचमधील सर्व जवानांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)