शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

व्याघ्र प्रकल्पाचे ‘एसटीपीएफ’ अभयारण्यात!

By admin | Updated: October 19, 2014 00:58 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांच्या संरक्षणासाठी देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ (एसटीपीएफ) तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार

गोळीबार प्रकरण : एनटीसीएच्या नियमांचे काय?नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांच्या संरक्षणासाठी देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ (एसटीपीएफ) तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच व मेळघाट येथे एसटीपीएफची फोर्स तयार करण्यात आली. एनटीसीएच्या निर्देशानुसार ही संपूर्ण फोर्स संबंधित व्याघ्र प्रकल्पात २४ तास तैनात राहून वाघाची सुरक्षा करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांनी एनटीसीएच्या कोणत्याही नियमांना न जुमानता, पेंचमधील एसटीपीएफ जवानांना बोर, उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव व टिपेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या वनरक्षकाप्रमाणे नियुक्त्या केले आहेत. यामुळे पेंचमधील ‘एसटीपीएफ’ केवळ नावापुरती फोर्स शिल्लक राहिली आहे. नियमानुसार या संपूर्ण फोर्सचा प्रमुख असलेला एसीएफ दर्जाचा अधिकारी हा २४ तास जवानांसह संबंधित व्याघ्र प्रकल्पातील मुख्यालयी असावा, असे अपेक्षित आहे. परंतु पेंचमधील या फोर्सची धुरा असलेले एसीएफ नागपुरातील मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेले दिसून येतात. एवढेच नव्हे, तर अनेक एसटीपीएफच्या जवानांना बाबुगिरीच्या कामात गुंतविले आहे. यामुळेच शिकारी बंदुकींसह पेंच प्रकल्पात खुलेआम फिरू लागले आहेत. गत आठवड्यात एसटीपीएफचा जवान सतीश शेंदरे याच्यावर शिकाऱ्यांनी केलेले गोळीबाराच्या घटनेतून हा खुलासा झाला आहे. मात्र त्याच वेळी या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) एसटीपीएफच्या भरतीसोबतच महत्त्वाच्या गाईडलाईन्स सुद्धा जारी केल्या आहेत. परंतु पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यापैकी एकाही नियमाचे पालन होताना दिसून येत नाही. शिवाय एनटीसीए सुद्धा केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. एनटीसीएच्या नियमानुसार एसटीपीएफच्या प्रत्येक जवानाजवळ शस्त्र असणे आवश्यक आहे. शिवाय संपूर्ण फोर्स एकाच ठिकाणी कॅम्पमध्ये राहणे आवश्यक आहे. मात्र असे असताना, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांनी कोणत्या अधिकारात एसटीपीएफ जवानांना वेगवेगळ्या अभयारण्यात पाठविले? याचा एनटीसीए जबाब मागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे. (प्रतिनिधी)