शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं (आ)चे संस्थापक थुलकर यांच्या पाठीशी

By admin | Updated: February 18, 2017 22:48 IST

थुलकर यांचे निलंबन अवैध आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असे रिपाइं(आ)चे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील

गायकवाड यांना प्रदेशाध्यक्षांना काढण्याचा अधिकार नाही :  राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांचे स्पष्टीकरण
 
 ऑनलाइ लोकमत
नागपूर, दि. १८ -   रिपाइं (आ) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांनी केली. परंतु राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद केवळ नामधारी असून त्यांना प्रदेशाध्यक्षांना काढण्याचा अधिकारच नाही, प्रदेशाध्यक्षांना केवळ राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय महासचिव हेच काढू शकतात, त्यामुळे थुलकर यांचे निलंबन अवैध आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. पाटील हे रिपाइं (आ) चे संस्थापक सुद्धा आहेत, हे विशेष.
 डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) ची स्थापना आपण भोपाळ येथे केली आहे. कंसातील आ म्हणजे आठवले नसून आंबेडकर असे आहे. महाराष्ट्रातील रिपाइं नेत्यांच्या भांडणाला कंटाळून आपण भोपाळमध्ये या पक्षाची स्थापना केली. आपण स्वत: रामदास आठवले यांच्या नेतृत्वात काम केल्याने पुढे त्यांनाच या पक्षाचे नेतृत्व करायला दिले. आजही या पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय भोपाळ हेच आहे. आपण संस्थापक असल्याने आपल्याला पक्षाच्या कार्यपद्धतीची पूर्ण माहिती आहे. कार्याध्यक्ष हे पद केवळ नामधारी असते. त्यांना प्रदेशाध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला काढण्याचा अधिकार नाही. सुमंतराव गायकवाड हे पक्षाचे सन्माननीय नेते आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते फारसे सक्रिय नाही. सध्या कार्याध्यक्ष हे उत्तमराव खोब्रागडे आहेत. त्यामुळे ते थुलकर यांना काढू शकत नाही तसेच ज्या कारणांसाठी थुलकर यांना काढण्यात आल्याचे सांगितले जाते, त्यासंदर्भात थुलकर यांनी दिलेल्या खुलाशाने आपले समाधान झाले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आपला पपूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, दुर्वास चौधरी, भाऊराव मस्के, आर.एस. वानखेडे उपस्थित होते
 
 मी प्रदेशाध्यक्षपदी कायम
 पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वत: कार्यकर्त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही, त्यामुळे नाराजी असली तरी युती कायम असल्याचे जाहीर केले आहे. मी पुणे येथे असताना त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, तेव्हा युती कायम असून प्रचार करण्याचे त्यांनी स्वत: आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार मी केवळ पुण्यातील युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे पत्रक काढले. त्यामुळे त्यांच्याच आदेशानुसार मी काम केल्याने ते मला पक्षातून कसे काढणार. पक्षातील काही दुखावलेल्या लोकांचे हे कृत्य आहे. आठवले यांनी तसे कुठलेही आदेश न दिल्याने मी प्रदेशाध्यक्षपदी कायम आहे. काही गैरसमज झाला असेल तर आठवले यांच्याशी भेट घेऊन ते दूर करण्यात येईल.
भूपेश थूलकर  प्रदेशाध्यक्ष, रिपाइं(आ.)