शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वन विभागाचा तीन वर्षासाठी ‘मास्टर प्लॅन’

By admin | Updated: June 12, 2016 02:44 IST

वन विभागाने पुढील तीन वर्षांसाठी ९९ कलमी ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. यासाठी वन विभागाने खास योजना सुद्धा आखली आहे.

नागपूर : वन विभागाने पुढील तीन वर्षांसाठी ९९ कलमी ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. यासाठी वन विभागाने खास योजना सुद्धा आखली आहे. वन विभागाने या मास्टरप्लॅनला ‘लक्ष्य पुढील तीन वर्षांचे’ असे नाव दिले आहे. ३६९ पृष्ठांच्या या मास्टरप्लॅनमधील ९९ विषयात विभागातील बहुतांश गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्याच विषयात वन विभागांतर्गंत उच्च अधिकाऱ्यांच्या किमान पाच चिंतन बैठक घेणे, या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाचे संनियंत्रण करणे, प्रत्येक महिन्यात किमान एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणे, वन विभागांतर्गंत संशोधन संस्थेची निर्मिती, नागरी क्षेत्रात वन उद्यानाची निर्मिती, ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्ष लागवड करणे, ताडोबा, गोरेवाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्र करण्याबाबत नियोजन करणे, ताडोबा येथे पर्यटन उत्सव आयोजित करणे, एमजी नरेगाच्या माध्ममातून सर्व राज्य महामार्ग आणि प्रत्येक जिल्हा मार्ग यांच्या आजूबाजूला झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार करणे, वनधन योजनेतर्गंत पुढील ३ वर्षांत किमान ३०० कोटींचा व्यवसाय वृद्घी कार्यक्रम राबविणे, त्यासाठी जिल्हानिहाय टाईपप्लॅन तयार करणे, सेल्फी काढण्यासाठी मंत्रालयात वाघ ठेवणे, तसेच घोषवाक्य तयार करणे, अशा विविध ९९ विषयांचा समावेश आहे. हा मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी वन विभागाने खास परिश्रम घेतले आहे. या व्यतिरिक्त राज्य शासनाने जून महिन्यात प्रकाशित केलेला ‘लोकराज्य विशेषांक’ हा खास वन विभागाच्या याच मास्टरप्लॅनवर आधारित आहे. त्यामध्ये या सर्व ९९ विषयांचा उल्लेख करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापैकी दीड कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी ही वन विभाग, सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विकास महामंडळ यांच्या खांद्यावर देण्यात आली असून, उर्वरित ५० हजार वृक्ष लागवड ही विविध शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्या, कृषी विभाग, रुग्णालये व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासंबंधी मागील ३० मार्च २०१६ रोजी राज्य शासनाने एक निर्णय जाहीर करून, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे.